
photo- social media
भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात कझाकिस्तानवर १३-० अशा दणदणीत विजयाने केली. त्यानंतर जपानविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला, मात्र त्या पराभवातून धडा घेत संघाने शानदार पुनरागमन केले. कोरियाला ४-१ ने नमवल्यानंतर भारतीय संघाने चायनीज तायपेईचा १३-१ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने आतापर्यंत ३२ गोल केले असून केवळ ६ गोल स्वीकारले आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार केतन कुशवाहा Ketan Kushwaha उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने स्पर्धेत आतापर्यंत ७ गोल केले आहेत. तसेच आशीष टानी पूर्तीनेही ६ गोल करत संघाच्या विजयात योगदान दिले आहे. गाझी खान आणि शाहरुख अली यांनीदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रशिक्षक सरदार सिंग यांनी पेनल्टी कॉर्नर आणि बचावातील त्रुटींवर विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तानने आपल्या गटात दमदार खेळ करत उपांत्य फेरी गाठली आहे. बांगलादेशवर ५-२ असा विजय मिळवत त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भारतासाठी हा सामना सोपा नसेल. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे नेहमीच भावनिक आणि तणावपूर्ण वातावरण असते. त्यामुळे दोन्ही संघांवर दबाव असणार आहे.
दरम्यान, भारतीय महिला संघ देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांनी आपले तिन्ही सामने जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी ३० गोल केले असून त्यांच्यावर फक्त दोन गोल झाले आहेत. उपांत्य फेरीत त्यांचा सामना चीनशी होईल. भारतीय संघ आपली विजयी मालिका कायम ठेवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.
IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?