
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला विलंब झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ अद्याप सुरू झालेला नाही. पहिले सत्र पावसामुळे पूर्णपणे रद्द झाले आणि दुसरे सत्रही अद्याप सुरू झालेले नाही.
दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आले. पावसामुळे दिवसाचा खेळ अद्याप सुरू झालेला नाही, त्यामुळे लंच ब्रेक घेण्यात आला आहे. आज सकाळपासून गॉलमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने दिवसाच्या खेळाला सुरुवात होऊ शकलेला नाही. पाऊस थांबल्यावर खेळपट्टीवरील कव्हर्स काढण्यात आले, परंतु, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. पाऊस थांबल्यास, दुसरे सत्र भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:२० वाजता सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु, मैदानातील कव्हर्स अजूनही काढण्यात आलेले नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीसाठी देवदत्त पडिक्कलने दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतीय संघात पुनरागमन केले. पडिक्कलने या संधीचे सोने करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आणि दिवसाचा खेळ संपताना १३१ धावांवर नाबाद राहिला. पडिक्कलने सलामीवीर केएल राहुलसोबत पहिल्या दिवशी दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आणि भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली.
भारत – यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
श्रीलंका – लाहिरू उदारा, निशान फर्नांडो, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो