
पाकिस्तानविरुद्ध श्री चरणीचा डेब्यूमध्ये महारेकॉर्ड
दीप्ती शर्माने घेतल्या ५ विकेट्स
भारताचा ६४ रन्सने दणदणीत विजय
India W Vs Pakistan W Updates: काल आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कपमधील महामुकाबला पार पडला. भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. भारताने या सामन्यात ६४ रन्सने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी अफलातून मारा करत विजयावर आपले नाव कोरले. दरम्यान पहिलाच वर्ल्ड कप सामना खेळणाऱ्या श्री चरणीने शानदार रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
महिला टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. या सामन्यात आपला पहिलाच वर्ल्ड कप सामना खेळणाऱ्या श्री चरणीने शानदार गोलंदाजी केली आहे. आपल्या अफलातून गोलंदाजीने तिने पाकिस्तानचा पराभवाचा मार्ग तयार केला. तिने एकूण ४ ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये केवळ २१ रन्स देत तिटणे महत्वाच्या अशा ३ विकेट्स प्राप्त केल्या.
डेब्यू सामन्यात श्री चरणीने असा खेळ कर नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टी २० वर्ल्ड कपमध्ये डेब्यू सामन्यात असे शानदार प्रदर्शन करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २७ रन्स देऊन ४ विकेट्स प्राप्त केल्या होत्या. श्री चरणीच्या भेदक माऱ्यापूढे पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली.
INDW vs PAKW Live: टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी; पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral
भारतीय फिरकीपटू श्रेयांका पाटीलने हवेत उडी मारत एक शानदार कॅच पकडला आहे. तिने पकडलेल्या या कॅचची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिने पकडलेल्या या अफलातून कॅचचे सर्व स्तरांतून कौतुक केले जा आहे.
IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral
पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयी सलामी देत आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने सर्व विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत 64 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेतील पहिले दोन गुण आपल्या खात्यात जमा केले. एजबेस्टन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान उभे केले. यावेळी दबावाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी करून मोठी धावसंख्या उभारली. मधल्या फळीत झालेल्या महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे भारताला मजबूत स्थिती मिळाली.