
आवेश खानच्या नावे अनोखा संयोग (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लखनौने केकआरवर कमालीचा विजय मिळवला आणि लागोपाठ दुसरा विजय प्राप्त केला. मात्र आता आवेश खानच्या असण्याचा यामध्ये अधिक वाटा असल्याचं चाहते म्हणत आहेत. कधी कधी एखाद्या खेळाडूच्या बाबतीत हा संयोग घडून येतो आणि आवेशच्या बाबतदेखील हेच घडले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Mukul Choudhary ने KKR ला विजयाच्या उंबरठ्यावरच रोखलं; LSG ने केला 3 विकेट्सने दारुण पराभव
आवेश खानशी संबंधित एक विलक्षण योगायोग
केकेआर विरुद्ध लखनौ सामन्यानंतर चाहत्यांच्या लक्षात आले की, जेव्हा जेव्हा लखनौला विजयासाठी एका चेंडूत एका धावेची गरज असते, तेव्हा आवेश खान नेहमी नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला असतो. याची सुरुवात २०२३ मध्ये आरसीबीविरुद्ध झाली, जेव्हा आवेशने तो ऐतिहासिक विजय साजरा करताना आपले हेल्मेट फेकले होते. तेव्हाही विजयाचे समीकरण एका चेंडूत एक धाव असेच होते.
२०२४ मध्येही असेच पुन्हा घडले होते. हा ट्रेंड इथेच थांबला नाही. २०२४ मध्ये, जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला, तेव्हा आवेश खान अशाच एका सामन्याचा भाग होता. आणि आता, आयपीएल २०२६ मध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. ईडन गार्डन्सवर, मुकुल चौधरी डावाच्या दुसऱ्या टोकाला होता, जेव्हा त्याने शेवटच्या चेंडूवर विजयाची नोंद केली.
आवेश लखनौचा लकी चार्म
आवेश हा लखनौचा लकी चार्म आहे. चाहते आता आवेश खानला लखनौचा लकी चार्म म्हणत आहेत. क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा आहे की, जर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि लखनौला एका धावेची गरज असेल, तर नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला आवेश खानची उपस्थिती विजयाची हमी असते. मुकुल चौधरीच्या शानदार खेळीने सामना जिंकला, तर आवेश खानच्या उपस्थितीने या विजयात एका अनोख्या विक्रमाची भर घातली.
KKR Vs LSG Live: केकेआरला पराभूत करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय