फोटो सौजन्य - सोशल मिडिया
मागील वर्षी जेतेपद जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या संघाने 18 वर्षानंतर ट्राॅफी नावावर केली. पण त्यानंतर या नव्या सिझनची मालकी आता आरसीबीचा संघ नव्या मालकाच्या हातात असणार आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) संघाला नुकतेच नवीन मालक मिळाले आहेत. चार प्रमुख जागतिक कंपन्यांनी संयुक्तपणे या फ्रँचायझीमध्ये हिस्सा विकत घेतला आहे. यानंतर, सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे: आरसीबीचे नाव बदलणार का? फ्रँचायझीचे नवीन उपाध्यक्ष, सत्यन गजवानी यांनी ही माहिती उघड केली आहे.
२००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा ती किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या यांच्या मालकीची होती. जेव्हा मल्ल्या यांची आर्थिक परिस्थिती खालावली, तेव्हा ही फ्रँचायझी विकली गेली आणि दिएगोने ती विकत घेतली. मात्र, फ्रँचायझीचे नाव मात्र बदलले नाही. आता संघ पुन्हा एकदा विकला गेल्याने, प्रश्न असा निर्माण होतो की, या वेळी नाव बदलेल का?
आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया, बोल्ट ग्रुप आणि ब्लॅकस्टोन यांनी संयुक्तपणे आरसीबीमध्ये हिस्सेदारी घेतली आहे. टाइम्स ग्रुपचे गजवानी हे त्याचे उपाध्यक्ष आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गजवानी यांनी संकेत दिला की, आरसीबी एक मजबूत ब्रँड बनल्यामुळे त्याचे नाव बदलले जाणार नाही.
“आमचा सध्या असा विश्वास आहे की, मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या कामगिरीच्या बाबतीत ही फ्रँचायझी एक ब्रँड म्हणून खूप मजबूत आहे. त्यामुळे संघाला, त्यांच्या दूरदृष्टीला, त्यांच्या विचारांना आणि ते ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याला पाठिंबा देणे ही आमची भूमिका आहे,” असे गजवानी म्हणाले.
क्रिकेटपटूंनंतर, PSL सोडून पळाले काॅमेंटेटर! पाकिस्तानी लीग सोडले अन् आयपीएलमध्ये केला प्रवेश
यात काही शंका नाही की आरसीबीकडे एक मजबूत ब्रँड आणि मोठा चाहतावर्ग आहे. या संघाने गेल्या वर्षी आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. यावेळी, संघ आपले विजेतेपद कायम राखण्याचा आणि सलग दुसरी ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न करेल. संघात विराट कोहलीसारख्या खेळाडूची उपस्थिती फ्रँचायझीच्या बाजारमूल्याबद्दल बरेच काही सांगून जाते. मागील सिझनमध्ये आरसीबीचा संघ दमदार फार्ममध्ये पाहायला मिळाला आहे. या सिझनसाठी झालेल्या मिनी लिलावामध्ये संघाने फार काही बदल केले नाहीत त्यामुळे आयपीएल 2026 च्या कामगिरीवर चाहत्यांची नजर संघावर असणार आहे.






