भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील काल रोमांचक सामना पार पडला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सामान्यामध्ये भारताच्या फलंदाजांची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहलीची सर्वात आधी विकेट गेली. विराटने ३ चेंडूंमध्ये ४ धावा करून आऊट झाला. तर कर्णधार रोहित शर्माने १२ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. भारताच्या संघाचा तोल रिषभ पंतने सांभाळला. रोहित शर्मा आऊट होताच फलंदाजीसाठी मैदानात अक्षर पटेल आला. त्याने १८ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. (फोटो सौजन्य – indiancricketteam इंस्टाग्राम अकाउंट)
[read_also content=”पुन्हा एकदा भारताने उडवला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा, ६ धावांनी मिळवला विजय https://www.navarashtra.com/sports/once-again-india-beat-pakistan-in-the-world-cup-winning-by-6-runs-545431.html”]
भारताच्या फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी फार वेळ मैदानात टिकू दिले नाही. सूर्यकुमार यादवने ८ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या तर शिवम दुबेने ९ चेंडूंमध्ये ३ धावा केल्या. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याही फार वेळ टिकू शकला नाही. रवींद्र जडेजाने पहिल्या चेंडूतच आऊट झाला. अर्शदीप सिंह सिंहने १३ चेंडूंमध्ये ९ धावा केल्या तर जसप्रीत बुमराह पहिल्या चेंडूंमध्येच बाद झाला. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ७ धावा केल्या. सिराजने केलेल्या या धावा भारतासाठी महत्वपूर्ण होत्या.
मोहम्मद सिराजवर कौतुकाचा वर्षाव
मोहम्मद सिराजला पाकिस्तानविरुद्ध एकही बळी मिळवता आला नाही, परंतु त्याने आर्थिकदृष्ट्या गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देण्यात सिराजने बॉल आणि बॅटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया केवळ 119 धावांवर ऑलआऊट झाली, ज्यामध्ये सिराजने संघासाठी अनेक मुख्य फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या आणि या महत्त्वपूर्ण धावांनी संघाच्या विजयाचा मार्ग खुला केला. सोशल मीडियावर चाहते सिराजचे कौतुक करत आहेत.
भारताच्या गोलंदाजांनी डाव सावरला
भारताच्या गोलंदाजीचा विचार केला तर टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट जसप्रीत बुमराहने घेतले. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने २ विकेट्स घेतले आहेत. अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतला. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजला एकही विकेट घेता आला नाही.






