फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडियाने वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना कालपासून सुरु झाला आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावांवर रोखले आहे. याचदरम्यान भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबरच्या रात्री निधन झाले. या महान अर्थतज्ञ आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेल्या या दिग्गज राजकारण्याची सर्वांनाच आठवण येत आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध एमसीजी येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. अशा प्रकारे भारतीय संघाने माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आज सकाळी भारतीय वेळेनुसार ५ वाजता सामना सुरु झाला. या एमसीजी कसोटी सामन्यात भारतीय खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उतरले तेव्हा भारताच्या प्रत्येक खेळाडूच्या हातावर काळी पट्टी बांधली आहे. हे पाहून बऱ्याचदा जणांना सुरुवातीला समजले नाही कारण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी उशिरा निधन झाल्यामुळे बऱ्याच जणांना या घटनेची खबर नाही. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाल्याचे ज्याला माहीत होते, त्याला हे माहीत होते की टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांची आठवण म्हणून हातावर काळ्या पट्टी बांधल्या आहेत.
The Indian Cricket Team is wearing black armbands as a mark of respect to former Prime Minister of India Dr Manmohan Singh who passed away on Thursday. pic.twitter.com/nXVUHSaqel
— BCCI (@BCCI) December 27, 2024
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह सर्व खेळाडू त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत. याआधी सुद्धा अशा प्रकारची श्रद्धांजली भारतीय संघाच्या खेळाडूंनी मैदानामध्ये वाहिली आहे. बीसीसीआय असे करतात की, जेव्हा देशामधील कोणतीही मोठी व्यक्ती किवां क्रिकेट विश्वामधील व्यक्तीचे निधन झाल्यास तेव्हा त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ खेळाडू काळी पट्टी बांधून त्या महापुरुषाला किंवा क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली जाते.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कालपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आता ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग झाली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४७४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाची पहिल्या इनिंगच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराहने चार विकेट्स नावावर केले तर रवींद्र जडेजाने ३ विकेट्स घेतले. आकाशदीपने २ विकेट्स घेतले तर वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट संघासाठी घेतला.