
आयपीएल 2026 मधून मुंबई इंडियन्स बाहेर
दुखापतीमुळे कर्णधार हार्दिक पंड्या बाहेर
उद्या केकेआरविरुद्ध भिडणार पलटण
Mumbai Indians in IPL 2026: तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात स्पर्धेतून बाहेर गेली आहे. प्लेऑफच्या स्पर्धेतून मुंबई इंडियन्स केव्हाच बाहेर गेली आहे. मात्र आता उर्वरित शेवटचे दोन साखळी सामने जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. उद्या मुंबईचा संघ केकेआरविरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधीच पलटणला मोठा धक्का बसला आहे.
आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हंगाम संपण्यापूर्वी मुंबईला मोठे धक्के बसले आहेत. जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा क्विंटन डी कॉक आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावा दुखापतीमुळे संघाबहेर गेले आहेत.
IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
मुंबई इंडियन्सला यंदा दुखापतीचा फटका बसला आहे. रोहित शर्मा देखील महत्वाचे सामने खेळू शकला नव्हता. हार्दिक पंड्या देखील दुखापतीमुळे बाहेर आहे. सूर्यकुमार कुमार वैयक्तिक कारणांमुळे मागील सामन्यात खेळी शकला नाही. त्यानंतर आता क्विंटन डी कॉक आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावा दुखापतीमुळे बाहेर गेल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबईचे पुढील दोन म्हणजेच यंदाच्या हंगामातील शेवटचे साखळी सामने राजस्थान रॉयल्स आणि कोलकता नाइट रायडर्सबरोबर होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघाला नव्या प्लेइंग 11 सह उतरावे लागणार आहे. राजस्थान आणि केकेआर अद्याप प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मुंबई त्यांना पराभूत करून आपला शेवट चांगला करणार की ते संघ आघाडी घेणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.
RR Vs LSG Pitch Report: जयपूरमध्ये रंगणार आकड्यांचा खेळ; राजस्थानचा एक विजय अन्…; पहा पीच रिपोर्ट
प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला दुखापतींनी घेरले आहे. क्विंटन डी कॉक आणि राज अंगद बावा दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. डी कॉकच्या डाव्या हाताच्या मनगटात टेंडनची दुखापत झाली आहे. तसेच राजच्या उजव्या हाताला दुकाहपट झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू संघाबहेर गेले आहेत.
SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. साखळी सामन्यांचा हा शेवटचा आठवडा असणार आहे. पुढील आठवड्यात प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप एका जागेवर कोणता संघ प्ले ऑफमध्ये जाणार याबाबत निश्चित झालेली नाही. आतापर्यंत गुजरात, आरसीबी आणि एसआरएचच्या संघाने क्वालिफाय केले आहे. कालच्या एसआरएचच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.