
भारताने ६४ रन्सने केला पाकिस्तानचा पराभव
फातिमा सनाने फील्डर्सवर फोडले परभवांचे खापर
कर्णधार फातिमा सना फलंदाजीत अपयशी
India W Vs Pakistan W: काल आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत अन् पाकिस्तानमध्ये महामुकाबला पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६४ रन्सने पराभव केला आहे. पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. अखेर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने पराभवाचे खापर कोणावर फोडले आहे ते जाणून घेऊयात.
भारताने दिलेला १७१ रन्सचा पाठलाग करत असताना पाकिस्तानचा संघ १०६ रन्सवर ऑल आउट झाला. दरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला कमी रन्समध्ये रोखणे शक्य झाले असते. अंतर अनेक महत्वाच्या कॅचेस सोडल्याने पाकिस्तानचा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे. यावर आता पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सनाने भाष्य केले आहे.
पाकिस्तानी संघाची कर्णधार फातिमा सनाने पाकिस्तानच्या पराभवाचे खापर वरिष्ठ खेळाडू आणि खराब फिल्डिंगवर फोडले आहे. फातिमा सनाने खराब फिल्डिंगवर परभवाचे खापर फोडले आहे. कॅच पकडल्यास सामना जिंकणे सोपे होऊ शकते. मात्र आम्ही मैदानावर अनेक कॅच सोडल्या. या चुका आमच्या वरिष्ठ खेळाडूकडून झाल्या आहेत. त्यामुळे पुढील सामन्यात आम्हाला यांच्या गोलंदाजी आणि फिल्डिंगवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण अशा चुका मैदानात पराभवाचा सामना करण्यास भाग पडतात.
IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral
फातिमा सनाने फलंदाजीवर देखील नाराजी व्यक्त केली आहे. संघाने सुरुवात चांगली केली होती. मात्र नंतर सगळे बिघडले. आमची फलंदाजी निराशाजनक राहिली. आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजीत पॉवरप्ले मध्ये चांगला खेळ केला होता. मात्र त्यानंतर दोन्ही ठिकाणी यांचा खेळ बिघडला. आम्हाला आशा आहे की येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही चांगला खेळ करू.
Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू
5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात विजयाने केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या अविस्मरणीय गोलंदाजीने पाकिस्तानवरील भारताच्या प्रभावी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला.