Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘…म्हणूनच पाकिस्तान भारताकडून हरतो’, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा संघाला घरचा आहेर

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात  १४ सप्टेंबर रोजी मुकाबला होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तान कर्णधार रशीद लतीफ यांनी त्यांच्याच संघाचीच पोल खोल केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 12, 2025 | 07:59 PM
Asia Cup 2025: '...that's why Pakistan loses to India', says former Pakistani cricketer

Asia Cup 2025: '...that's why Pakistan loses to India', says former Pakistani cricketer

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी सामना  
  • पाकिस्तानी माजी कर्णधार लतीफ यांच्या मते पाकिस्तान भावनिक होतो आणि हरतो 
  • पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत-लतीफ 

India vs Pakistan match in Asia Cup : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी महामुकाबला होणार आहे. या सामान्याविषयी  क्रीडा विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध भारताने सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानचा पहिला सामना आज ओमानविरुद्ध खेळवला जात आहे. अशातच भारताविरुद्ध होणाऱ्या सामान्यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी पाकिस्तान संघाच्या काही चुका सांगून त्यांच्या संघाला घरचा आहेर दिला आहे.

पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी असा विश्वास दर्शवला आहे की,  जेव्हा जेव्हा त्यांचा संघ भारताविरुद्ध मैदानावर उतरत असतो, तो भावनांमध्ये  वाहून जातो आणि हेच एक कारण आहे की पाकिस्तानला नेहमीच महत्वाच्या सामान्यामध्ये भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. मागील दहा वर्षांत भारताने या ऐतिहासिक प्रतिस्पर्ध्यावर नेहमीच वर्चस्व गाजवलेले दिसून येते. भारत आणि पकसीतान यांच्यात खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी भारताने १२ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : Liton Das ने बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात उडवली खळबळ! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

भारत-पाकिस्तानसामान्याबाबत रशीद लतीफ यांचे मत काय?

पाकिस्तानचचे माजी खेळाडूने म्हटले की, जेव्हा आपण भारताविरुद्ध खेळत असतो, तेव्हा आपण खूप भावनिक होऊन जातो आणि घाईघाईने सर्वकाही साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हेच एक  कारण आहे की आपण अनेकदा सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्यास अपयशी ठरतो आणि हरतो. लतीफ म्हणाले की, “दुसरीकडे, भारत खेळपट्टी आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळत असतो आणि म्हणूनच त्याला यश देखील प्राप्त होते. पाकिस्तानवर अपेक्षांचे ओझे असते आणि भारत त्याचा फायदा घेत आला आहे.”

पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ मजबूत

रविवारी, १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ दुबई येथे आशिया कपच्या गट टप्प्यात भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी, लतीफने भारतीय संघाच्या ताकदीचे देखील कौतुक केले आहे. लतीफ यांच्यामते, “भारतीय संघ संतुलन, संयम आणि कौशल्याचे मिश्रण असून ते इतर संघांपेक्षा खूप पुढे दिसून येत आहे.” लतीफ यांनी  हार्दिक पंड्याला संघाचा ‘एक्स-फॅक्टर’ संबोधले आहे आणि सांगितले की त्याच्यात  एकट्याने सामन्याचा मार्ग बदलण्याची ताकद आहे.

हेही वाचा : IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर..

पंड्या हा एक्स-फॅक्टर

लतीफ म्हणाले की , हार्दिक पंड्या हा एक धोकादायक खेळाडू असून मधल्या फळीतील फलंदाज किंवा खालच्या फळीतील फलंदाज सामन्याचे टेबल उलटू शकतात. हे त्याने खूप वेळा सिद्ध करून दाखवले आहे. याशिवाय, त्याने सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मासह  संजू सॅमसन सारख्या खेळाडूंमुळे संघाचे संतुलन टिकून आहे असे म्हटले आहे. तर जसप्रीत बुमराहची गोलंदाजी ही भारताची मुख्य ताकद असल्याचे म्हटले आहे.

 

Web Title: Rashid latif says pakistan loses against india because he gets emotional asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Pakistan vs Oman
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Pakistan vs Oman : पाकिस्तानने Toss जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; ओमान पदर्पणात दाखवणार दम? 
1

Pakistan vs Oman : पाकिस्तानने Toss जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; ओमान पदर्पणात दाखवणार दम? 

IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर.. 
2

IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर.. 

पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता; रँकिंगमध्ये ३०व्या क्रमांकावर; तरीही ‘आमचा फिरकी गोलंदाज जगातील सर्वोत्तम’
3

पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या बड्या बड्या बाता; रँकिंगमध्ये ३०व्या क्रमांकावर; तरीही ‘आमचा फिरकी गोलंदाज जगातील सर्वोत्तम’

Asia Cup 2025 : तीन संघाचा सुपर 4 मधून होणार पत्ता कट, जाणून घ्या आशिया कप 2025 चे गुणतालिकेचे गणित
4

Asia Cup 2025 : तीन संघाचा सुपर 4 मधून होणार पत्ता कट, जाणून घ्या आशिया कप 2025 चे गुणतालिकेचे गणित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.