
‘काका तुमचं वय झालं, आता…’; Virat-Rohit वर जहरी टीका, क्रिकेटविश्वात एकच खळबळ
एएनआयच्या एका पॉडकास्टमध्ये, आरव्हीएस मणी यांनी धक्कादायक खुलासा करत आरोप केला की, पत्रकार आणि नामांकित क्रिकेटपटूंसह भारताला भेट देणाऱ्या पाकिस्तानी शिष्टमंडळांनी भारतात अमली पदार्थांची तस्करी केली. २००६ च्या सुमारास भारताला भेट दिलेल्या साफमा (SAFMA) शिष्टमंडळाचा संदर्भ देत ते म्हणाले की, भारतात अमली पदार्थ पोहोचवणे हे नेहमीच पाकिस्तानच्या अधिकृत आणि हेतुपुरस्सर धोरणाचा भाग राहिले आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हे धक्कादायक असू शकते, परंतु पाकिस्तानी खेळाडूंनी यापूर्वीही, अनेकदा अगदी किरकोळ रकमेसाठी, असे केले आहे.
आरव्हीएस मनी यांनी प्रसिद्ध पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ यांची थेट नावे घेतली. त्यांनी दावा केला की, या क्रिकेटपटूंनी अमली पदार्थ बाळगल्याची कबुली दिल्यानंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने त्यांना देशाबाहेर काढल्याची प्रकरणे घडली होती. मात्र, त्यावेळी, हे वैयक्तिक वापरासाठी होते असा दावा करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण मनी यांच्या मते, हे केवळ एक निमित्त होते. त्यांनी पुढे असेही सांगितले की, सलीम मलिक आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासारखे इतर नामांकित खेळाडूदेखील अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये सामील होते.
मनी म्हणाले की, सलीम मलिक आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासारखे मोठे खेळाडूही या प्रकरणात सामील होते. मात्र, या दाव्यांबद्दल अद्याप कोणतीही अधिृत माहिती दिलेली नाही. याआधी पाकिस्तानी क्रिकेटपटू अनेक मॅच-फिक्सिंग प्रकरणांमध्ये दोषी आढळले आहेत.
तत्कालीन पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूलमर यांच्या मृत्यूबाबत मनी यांनी एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, प्रशिक्षकांनी अमली पदार्थांच्या पुरवठ्याला विरोध केला होता. त्यानंतर, मार्च २००७ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये वूलमर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या सर्व दुव्यांना जोडल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, अमली पदार्थांच्या तस्करीला केलेल्या विरोधामुळेच त्या प्रशिक्षकाला आपला जीव गमवावा लागला.
Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध! गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?