
Sports Budget 2026: Nirmala Sitharaman has hit the jackpot for sports enthusiasts! A package of a staggering 'this much' crore rupees has been announced for SMEs.
Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल आहे. या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की क्रीडा उपकरणे आता स्वस्त होणार आहेत. ज्यामुळे खेळाडू आणि तरुणांना चांगल्या सुविधा उपभोगता येतील. ग्रामीण भागात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागात क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एक मोठी योजना देखील त्यांनी जाहीर केली आहे.
तसेच याव्यतिरिक्त, मुले आणि तरुण खेळाडूंना खेळांमध्ये रुची वाढवण्यासाठी, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी अनेक पावले उंचणल्यात येतील. या उपक्रमात क्रीडा प्रतिभा विकास, प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समावेश, स्पर्धा आणि लीग आयोजित करणे आणि क्रीडा प्रशिक्षणासाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे यांचा समावेश असणार आहे.
अर्थमंत्र्यांनी महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत एसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) साठी ₹१०,००० कोटी रुपयांची तरतूद देखील जाहीर केली, ज्यामुळे ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात त्यांची प्रतिभा विकसित करण्यास मोठी मदत होणार आहे.
यामुळे केवळ खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळणार नसून ग्रामीण स्तरावर खेळांचा दर्जा देखील सुधारण्यास मदत होईल. मुले आणि तरुण खेळांकडे अधिक आकर्षित होतील, ज्यामुळे भारतात खेळांचा सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. केंद्र सरकारचा हा उपक्रम क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताला क्रीडा केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
भारताकडे २०३० मध्ये १०० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद असणार आहे. अहमदाबादमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच भारत २०३६ च्या ऑलिंपिक खेळांसाठी आपली दावेदारी मजबूत करत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात या प्रकारे धोरणात्मक बदल घडत आहेत. १० वर्षांच्या विकासासाठी वचनबद्ध राहून, सरकार संरचनात्मक बदलाचा पाया रचण्यासाठी प्रयत्नशील आहे. याची खात्री करत आहे की “खेलो इंडिया अभियाना” ची भावना भारताच्या राष्ट्रीय ओळख आणि आर्थिक रचनेचा कायमचा भाग होणार आहे.
हेही वाचा : IND vs PAK, Under-19 World Cup Live : बुलावेयोमध्ये भारत अडचणीत! वैभव, आयुषसह 3 गडी माघारी; मोहम्मद सय्यमच्या 2 विकेट्स
आज, खेलो इंडिया हा केवळ एक क्रीडा स्पर्धाच नाही तर भारताच्या क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याचे, प्रतिभेला संधी देण्याचे आणि जागतिक स्तरावर देशाची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठीचे प्रतीक आहे.