
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
T20 World Cup 2026: टीम इंडियाने T20 World Cup 2026 जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यानंतर सर्व भारतीय खेळाडू ट्रॉफीसह आनंद साजरा करताना दिसत आहेत. भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली, टीम इंडियाची सुरूवात या स्पर्धेमध्ये अपेक्षेप्रमाणे झाली नाही पण त्यानंतर लीग टप्प्यातील सर्व सामन्यामध्ये विजय मिळवला आणि सुपर 8 चा टप्पा गाठला होता. भारताच्या संघाला सुपर 8 च्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर भारताच्या संघाने सलग सुपर 8 आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी करत फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद नावावर केले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे की २०२६ चा विश्वचषक संपल्यानंतर भारतीय खेळाडू कोणत्या स्पर्धेत खेळतील आणि ही स्पर्धा कधी सुरू होईल.
टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंचे पुढील लक्ष्य आयपीएल २०२६ असेल. स्पर्धेचा १९ वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे, तर अंतिम सामना ३१ मे रोजी होणार आहे. या हंगामात पुन्हा एकदा १० संघ जेतेपदासाठी स्पर्धा करतील. २०२५ मध्ये, आरसीबीने १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला, त्यामुळे या हंगामातील पहिल्या सामन्यात फ्रँचायझी पंजाब किंग्जचा सामना करू शकते.
🚨 Announcement 🚨 Get ready! #TATAIPL2026 is all set to start from the 28th of MARCH! pic.twitter.com/RF4Ixvo1J5 — Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
बीसीसीआयने अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. ते लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले जाईल. बोर्ड सध्या निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची वाट पाहत आहे. आरसीबीच्या होम ग्राउंड, चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने आयोजित करण्याच्या शक्यतेबद्दल अनेक प्रश्न होते, परंतु आता ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. टी-२० विश्वचषकात सहभागी होणारे टीम इंडियाचे सर्व खेळाडू आयपीएलमधील फ्रँचायझींचा भाग आहेत आणि ते खेळताना दिसतील.
भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. फायनलच्या दिनी आयपीएल 2026 ची घोषणा केली आहे. अनेक खेळाडू नव्या फ्रॅन्चायझीसाठी खेळताना दिसणार आहेत. संजू सॅमसन या सिझनमध्ये सीएसकेसाठी खेळताना दिसणार आहे.