Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 29, 2025 | 12:28 AM
IND vs PAK: तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान; ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे
Follow Us
Close
Follow Us:
  • तिलक-दुबेने फलंदाजीत
  • कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान
  • ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे
India Beat Pakistan: भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून २०२५ चा आशिया कप जिंकला. टीम इंडिया नवव्यांदा आशियाई चॅम्पियन बनली. अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.
India do it, yet again 🏏 Asia Cup final SCORECARD ➡️ https://t.co/6yhNKeDomw pic.twitter.com/bJMANYitMY — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 28, 2025

ही आहेत भारताच्या विजयाची ३ मोठी कारणे

फलंदाजांनी सावरला डाव

पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या २० धावांवर ३ विकेट पडल्या होत्या. अशा परिस्थितीत तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी महत्त्वाची ५७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ७७ धावांवर असताना सॅमसन २४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला. तिलक वर्माच्या साथीने त्याने शानदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात तिलकने तुफानी फलंदाजी करताना नाबाद ६९ धावा केल्या, ज्यात ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेनेही ३३ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजांनी तोडली पाकिस्तानची कंबर

दुबईमध्ये पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान आणि फखर जमान या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची मोठी भागीदारी केली. मात्र, वरुण चक्रवर्तीने पहिली विकेट मिळवताच भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १४६ धावांवर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ

कुलदीप यादवची जादुई गोलंदाजी

कुलदीप यादवने आपल्या शानदार गोलंदाजीने पाकिस्तानची मोठी भागीदारी तोडली. त्याने फखर जमान आणि सईम अयुब यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. याशिवाय, सलमान आगा, फहीम अशरफ आणि शाहीन अफ्रिदी यांनाही त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या स्पर्धेत कुलदीप यादवने आतापर्यंत १७ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामुळे तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

Web Title: These are the 3 big reasons for indias victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 12:28 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Sports
  • Sports News
  • Team India
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?
1

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर,  या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व
2

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…
3

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…

खालिदा झिया यांच्या निधनानंतर, हे दोन महत्त्वाचे सामने अचानक ढकलण्यात आले पुढे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक
4

खालिदा झिया यांच्या निधनानंतर, हे दोन महत्त्वाचे सामने अचानक ढकलण्यात आले पुढे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.