
Changes are expected in the Indian team before the T20 World Cup! This player might get lucky and replace Washington Sundar; read the details.
Riyan Parag to replace Washington Sundar? ७ फेब्रुवारीपासून सुरू टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ कोणत्याही औपचारिक सराव सामन्यांशिवाय मैदानात उतरणार होता. तथापि, आता अशी बातमी समोर येत आहे की, बीसीसीआय ४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संघासाठी सराव सामना आयोजित करण्याच्या विचारात आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असण्याची शक्यता आहे आणि असे देखील बोलेल जात आहे की भारत अ खेळाडूंसोबत संघात खेळू शकतो. यामुळे संघाला सामन्याच्या स्थितीत येण्याची आणि खेळाडूंना विश्वचषकाची तयारी करण्यासाथी मदत मिळू शकेल.
भारतासाठी संघासाठी सर्वात मोठी चिंता जाणवत आहे ती म्हणजे, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि फलंदाज तिलक वर्माची असनरी दुखापत. सुंदरला बाजूचा ताण आहे, ज्यातून पुनर्प्राप्ती मंद आहे. परिणामी, तो विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, तिलक वर्माची प्रकृती चांगली असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तो १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवडकर्त्यांना १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यासाठी संघ पूर्णपणे तयार असायला हवा असे वाटत आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रियान परागचे नाव आघाडीवर आहे. पराग स्वतः खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्याला बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे तयारी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. पराग २८ आणि ३० जानेवारी रोजी दोन सिम्युलेशन सामने खेळणार आहे. जर तो फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला तर त्याला २ फेब्रुवारी रोजी मुंबईत संघात सामील होण्यासाठी निर्देश दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याने यो-यो फिटनेस चाचणी देखील उत्तीर्ण केली आहे,
या वर्षाच्या सुरुवातीला, निवडकर्त्यांनी सुंदरच्या जागी रवी बिश्नोई तर न्यूझीलंड टी-२० मालिकेसाठी तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता. आता, संघात आवश्यक अधिकृत बदल ३० जानेवारीपर्यंत करण्यात येऊ शकतात. बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, “वॉशिंग्टन सुंदरला लवकर परत आणणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण त्याचा त्याच्या आयपीएल हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, बॅकअप पर्यायांवर गांभीर्याने विचार केला जात आहे.”