
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
Will Rohit Sharma play in the 2027 World Cup or not : भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद जिंकले आहे. तर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याचा आनंद साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, हिटमनने भारताला टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. आता रोहित शर्माचे डोळे २०२७ चा विश्वचषक खेळण्यावर आहेत. तथापि, रोहित शर्मा २०२७ च्या विश्वचषकात खेळणार का याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
IPL 2025 : पहिल्याच सामन्यात होणार घमासान; जिंकण्याच्या इराद्याने ‘हे’ दोन संघ उतरणार मैदानात…
क्रिकबझच्या अहवालानुसार, रोहित शर्माने २०२७ च्या विश्वचषकासाठी तंदुरुस्त आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी एक योजना तयार केली आहे, तो अभिषेक नायरसोबत त्याच्या फिटनेस, फलंदाजी आणि दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जवळून काम करणार आहे. अभिषेक नायर सध्या टीम इंडियाच्या कोचिंग युनिटचा भाग आहे. याआधी त्याने केकेआरसाठीही काम केले आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या नायरने अनेक खेळाडूंसोबत काम केले आहे. क्रिकबझच्या मते, आता नायर रोहितच्या फिटनेसवर काम करण्यास तयार आहे.
ROHIT SHARMA FOR WORLD CUP 2027 📢 – Rohit Sharma has devised a plan to remain fit and competitive for the World Cup, he will collaborate with Abhishek Nayar to focus on his fitness, batting & approach. [Vijay Tagore from Cricbuzz] pic.twitter.com/C1rrd7wzqi — Johns. (@CricCrazyJohns) March 12, 2025
जर रोहित शर्मा २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करत असेल तर ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. हिटमनने त्याच्या उत्तम कर्णधारपदाने खूप प्रभावित केले आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली, हिटमॅनने एकही सामना न गमावता भारतीय संघाला अंतिम फेरीत नेले. त्याच वेळी, २०२४ च्या टी-२० विश्वचषकात, भारतीय संघ हिटमनच्या नेतृत्वाखाली अपराजित राहिला आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद जिंकले. एवढेच नव्हे तर रोहित शर्मा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने आतापर्यत ४ वेळा भारताच्या संघाला आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये नेले आहे आणि यामध्ये २जेतेपद जिंकले आहेत.
रोहितने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जवळजवळ सर्वच सामन्यांमध्ये भारताला चांगली सुरुवात करून दिली. याशिवाय, त्याने अंतिम सामन्यात ७६ धावांची खेळी खेळली आणि भारताला विजेतेपद जिंकण्यास मदत केली. आतापर्यंत रोहित शर्माने भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने २७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.७६ च्या सरासरीने १११६८ धावा केल्या आहेत. तर १५९ टी-२० सामन्यांमध्ये हिटमनच्या बॅटने ४२३१ धावा केल्या आहेत.