
रोहित शर्माचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी केले सन्मानित
पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ व्हायरल
Rohit Sharma: क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेट क्षेत्रात केलेल्या शानदार कामगिरीमुळे रोहित शर्माला पद्मश्री देखील सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रोहित शर्माला सन्मानित करण्यात आले आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
2024 हे वर्ष रोहित शर्मासाठी अत्यंत खास ठरले. त्याच्या नेतृत्वर भारतीय संघाने दुसऱ्यांदा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे. त्यासोबतच टेनिसचे दिग्गज खेळाडू अमृतराज यांना ‘पद्म भूषण’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे.
#WATCH | Delhi | Former Captain of the Indian Cricket Team, Rohit Sharma, awarded the Padma Shri by President Droupadi Murmu (Video source: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/ckz1kc4poF — ANI (@ANI) June 23, 2026
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माने भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याआधी रोहित शर्मा 2023 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वर भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…
Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार?
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, ‘२०२७ च्या विश्वचषकाची तयारी सुरू आहे. ही योजना आखण्यासाठी क्रिकेटशी संबंधित सर्व महत्त्वाच्या लोकांची मदत घेतली जात आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबाबत जे काही नियोजन केले जात आहे, ते सध्या माध्यमांना किंवा बाहेरील लोकांना उघड केले जाणार नाही. देवजित सैकिया म्हणाले, मंडळाचा प्रमुख म्हणून आमच्याकडे तज्ज्ञांची एक उत्कृष्ट टीम आहे.
IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात
आम्ही सर्व संघांना सोबत घेऊन जातो. जे काही निर्णय घेतले जातात, त्यात क्रिकेट समिती, निवड समिती, सपोर्ट स्टाफ, मुख्य प्रशिक्षक आणि स्वतः खेळाडू यांचा सहभाग असतो. आमच्यात सतत संवाद सुरू असतो. ते पुढे म्हणाले की, ‘त्यामुळे, या विषयावर वेगळी बैठक घेण्याची गरज नाही, कारण ती प्रक्रिया सुरू आहे. शिवाय, या योजना अत्यंत गोपनीय आणि धोरणात्मक बाबी असल्याने, मी त्या प्रसारमाध्यमांसमोर किंवा जनतेसमोर उघड कराव्यात असे मला वाटत नाही. त्या उघड करण्याचा मला अधिकार नाही. या अशा बाबी आहेत ज्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या बंद दाराआडच राहिल्या पाहिजेत.’