Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेन्नईतील तांबरम रेल्वे स्थानकातून ४ कोटी रुपयांची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यांसह तिघांना अटक

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करण्यावर बंदी आहे, तसेच सरकारी मालमत्ता,सरकारी गाड्या वापरण्यावर सुद्धा बंदी आणली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2024 | 03:17 PM
चेन्नईतील तांबरम रेल्वे स्थानकातून ४ कोटी रुपयांची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यांसह तिघांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करण्यावर बंदी आहे, तसेच सरकारी मालमत्ता,सरकारी गाड्या वापरण्यावर सुद्धा बंदी आणली जाते. निवडणुकीच्या काळात जास्त घोटाळे होण्याची शक्यता असते. असाच एका प्रकार चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडला.रात्री उशिरा नेल्लई एक्स्प्रेस ट्रेनमधून ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन तिघंजणं रेल्वेने प्रवास करत होते.

सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. या काळात कोणताही बेकायदेशीर प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष मोहिमा राबवल्या जातात. ४ कोटी पेक्षा जास्त रक्कम घेऊन पळून जात असलेल्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी ४ कोटी रुपये रक्कम सहा पोत्यांमध्ये घेऊन पळून जात होते. हा पैसा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये वापरायचा होता.

चेंगलपट्टू जिल्हा निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, जप्त करण्यात आलेले पैसे पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिघांमध्ये भाजप नेते आणि खासगी हॉटेलचा व्यवस्थापक सतीश,त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल या तिघांचा समावेश आहे. भाजपचे लोकसभा उमेदवार नयिनर नागेंद्रन यांच्या टीमने सांगितलेल्या सूचनेनुसार सतीशने थिरुनेलवेली येथे काम केले, असे सांगत त्यांनी कबुली दिली आहे.

चेंगलपट्टूचे जिल्हा निवडणूक आयुक्त म्हणाले, चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकात शनिवारी भरारी पथकाने ४ कोटी रुपये रक्कम जप्त केली. जप्त करण्यात आलेली ही रक्कम पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. प्राप्तिकर विभाग जप्त करण्यात आलेल्या रक्कमेची चौकशी करणार आहे. कारण ही रक्कम १० लाखांच्या वर आहे. आदर्श आचारसंहितेनुसार निवडणूक काळात १० लाखांच्या वरील रकमेची चौकशी करणे बंधनकारक आहे, असे चेंगलपट्टूचे जिल्हा निवडणूक आयुक्त यांनी सांगितले आहे. जप्त करण्यात आलेली सर्व रक्कम प्राप्तिकर विभागाला पाठवण्यात आली आहे. त्यानंतर आता या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे, असे अधिकारी म्हणाले.

Web Title: Cash worth rs 4 crore seized from tambaram railway station in chennai bjp workers and three arrested cod of couduct loksabha nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2024 | 03:17 PM

Topics:  

  • BJP
  • chennai
  • Election2024

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.