
UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन
या निर्णयामागील मुख्य कारण वाढता डिजिटल फसवणुकीचा दर आहे. आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये २५५१ कोटी रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली आणि २०२५ पर्यंत हा आकडा २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. एकूण फसवणुकीपैकी ९८% व्यवहार हे १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे असतात. यामुळे ऑनलाइन धमक्यांद्वारे होणारी फसवणूक देखील रोखली जाईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ज्ञांनुसार या निर्णयाचे काही तोटेही आहेत. तातडीच्या कामांसाठी (उदा. मेडिकल इमर्जन्सी किंवा तातडीची खरेदी) १०,००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करताना १ तास वाट पाहावी लागेल, ज्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. याशिवाय प्रवासासाठी अचानक तिकीट बुक करायचे असेल आणि ती रक्कम १०,००० रुपयांच्या वर असेल, तर १ तास वाट पाहणे जीवावर बेतू शकते. अशा वेळी वेळेवर पैसे न पोहोचल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.