
आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल
Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप
भारतातील १० वर्षांचा प्रवास आणि काऊंटर रिप्लेसमेंट सुविधेच्या लाँचबद्दल मत व्यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा यांनी सांगितले की, “भारतात १० वर्षे पूर्ण करणे आणि १५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचणे हा आयटेलमधील आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आमचे भागीदार, टीम आणि ग्राहक यांची अविरत समर्पितता व पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. आजच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून आम्ही काळासह मिळवलेला विश्वास दिसून येतो. आम्हाला फीचर फोन्ससाठी काऊंटर रिप्लेसमेंट सुविधा सुरू करताना अभिमान वाटत आहे. हा उपक्रम प्रत्यक्ष आमच्या ग्राहकांच्या प्रतिसादातून साकारला आहे. ग्राहकांचे प्रत्येक मत आणि त्यांच्याशी होणारा प्रत्येक संवाद आमच्या नाविन्यपूर्ण बदलांना दिशा देतो. आम्ही हा प्रवास सुरू केला, तेव्हा डिजिटल जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या व्यक्तींसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय होते. आम्ही यापुढेही टिकाऊ, विश्वासार्ह आणि परवडणारी उत्पादने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्यासाठी आयटेल ब्रँड संपूर्ण भारतात ओळखला जातो.”
ब्रँडच्या या प्रवासामधून सखोल उद्देश दिसून येतो, तो म्हणजे यापूर्वी स्मार्ट तंत्रज्ञानाशी फारसा संबंध न आलेल्या भारतातील लाखो व्यक्तींना डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांपासून घरगुती उपकरणे शोधणाऱ्या कुटुंबांपर्यंत, ग्राहकांना जगाशी जोडून ठेवण्यात या ब्रँडने अविभाज्य भूमिका बजावली आहे. जागतिक स्तरावर, आयटेल आता ८० हून अधिक देशांमध्ये उपस्थित आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फीचर फोन्स, स्मार्टफोन, टीव्ही, सौर उत्पादने, पर्सनल ग्रूमिंग उत्पादने आणि घरगुती उपकरणांचा समावेश आहे. उत्पादनांच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा ठेवून हा ब्रँड ग्राहकांच्या दैनंदिन तंत्रज्ञान गरजा पूर्ण करत आहे, तसेच भारताच्या वाढत्या डिजिटल महत्त्वाकांक्षांना सातत्याने पाठबळ देत आहे.
Tech Tips: फोन चार्जरवर लिहीलेला R कोड कोणते संकेत देतो? 99% लोकं करतात दुर्लक्ष, वाचून व्हाल हैराण