
Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन - निर्मला सीतारमण
Union Budget 2026: आजपासून वाढणार स्मार्टफोन्सच्या किंमती? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या
निर्मला सितारमण म्हणाल्या की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताच्या आर्थिक विकासात या दोन्ही गोष्टींची अत्यंत महत्त्वाची भुमिका असणार आहे. असे नवीन तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक विकासासाठी वाढीचे गुणक म्हणून काम करणार आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, एकीकडे नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वेगाने वाढत आहे. तर दुसरीकडे यामुळे पाणी आणि विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संसाधनांचा योग्य वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – X)
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या
यापूर्वी, 30 जानेवारी रोजी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मध्येही एआयबद्दल स्पष्ट शब्दांत बोलण्यात आले होते. सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं होतं की, कोण सर्वात मोठे AI मॉडेल तयार करते, यावर भारताचे AI भविष्य ठरवले जाणार नाही. तर संगणकीय शक्ती, वीज, टॅलेंट, नोकऱ्या आणि भांडवल यासारख्या मर्यादा कोण चांगल्या प्रकारे हाताळू शकते या सर्वांवर भारताचे AI भविष्य ठरवले जाणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, सरकारचे लक्ष केवळ तंत्रज्ञान निर्माण करण्यावर नाही तर त्याचा सुज्ञपणे वापर करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे यावर देखील सरकार लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे देशाला AI चा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल.
तसेच आजच्या अर्थसंकल्पात स्मार्टफोनच्या किंमतीबाबत देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान भारताच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत आजच्या अर्थसंकल्पात घोषणा देखील करण्यात आली आहे.