राज्यातील शेतकरीवर्गाला अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.