Vasai-Virar News: वसई-विरार शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १५ ऑगस्टपासून वसई-विरार महापालिका मुख्यालयाबाहेर त्यांनी ‘सडक सत्याग्रह’ उपोषण सुरू केले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विवेक तिवारी यांनी उपोषण सुरू केले आहे.
वसई-विरार शहरातील रस्त्यांच्या समस्येवर वारंवार आवाज उठवूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेरच उपोषण सुरू करण्यात आले आहे.
‘सडक सत्याग्रह’च्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडली जात आहे.
Vasai-Virar News: वसई-विरार शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १५ ऑगस्टपासून वसई-विरार महापालिका मुख्यालयाबाहेर त्यांनी ‘सडक सत्याग्रह’ उपोषण सुरू केले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विवेक तिवारी यांनी उपोषण सुरू केले आहे.
वसई-विरार शहरातील रस्त्यांच्या समस्येवर वारंवार आवाज उठवूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेरच उपोषण सुरू करण्यात आले आहे.
‘सडक सत्याग्रह’च्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडली जात आहे.