Holi 2025: भारतातील एक असे गाव जिथे रंगांनी नाही तर अंगारांनी खेळली जाते होळी
होळी हा रंगांचा उत्सव आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. वसंत ऋतूच्या आगमनस्तव होळी हा सण साजरा केला जातो. लोक यावेळी एकमेकांना रंग लावतात, नवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना मिठाई भरवून सणाचा आनंद लुटतात. देशातील विविध भागात होळीचा सण अनोख्या पद्धतींनी खेळाला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातही विविध भागांत पाणी, माती, राख, रंग, गुलाल, घन रंग, शेण, भाज्या अशा अनेक गोष्टींनी होळी खेळली जाते.
मथुरा-वृंदावनमध्ये फुलांची होळी आणि बरसाना येथील लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. पर्यटकांनीही येथे भेट देऊन येथील आगळ्यावेगळ्या परंपरा आणि संस्कृतीचा आनंद लुटतात. मात्र तुम्ही कधी आगीच्या अंगारांची होळी पाहिली आहे का? वास्तविक, देशातील एका गावात रंगांनी नाही तर अशी अंगारांनी होळी खेळली जाते. येथील उत्सवाशी संबंधित एक अनोखी परंपरा आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Women’s Day 2025: भारतातील अशा काही इमारती ज्या पुरुषांनी नाही तर महिलांनी उभारल्या
कुठे खेळली जाते अंगारांची होळी?
हे अनोखे गाव म्हणजे मलकर्नेम गाव, जे गोव्यात वसले आहे. होळीचा सण दुसऱ्या दिवशी होळी दहनाने सुरू होतो जो वाईटाच्या अंताचे प्रतीक मानला जातो. दक्षिण गोव्यातील पणजीपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या माल्कोर्नम गावात, लोक हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करतात आणि शतकानुशतके त्याचे पालन करत आहेत.स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू झाली होती आणि त्याची कोणतीही नोंद नाही.
Women’s Day 2025: 8 मार्चलाच का साजरा केला जातो महिला दिन; जाणून घ्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
काय आहे ही परंपरा?
शेनी उझो म्हणजेच अग्नीची होळी हा तेथील मंदिर संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा होळीच्या सणाच्या पूर्वसंध्येला साजरी केली जाते. होळीच्या सणाच्या एक पंधरवडा आधी शेनी उजोची तयारी सुरू केली जाते आणि ज्यांना या विधीमध्ये भाग घ्यायचा आहे ते धार्मिक जीवन जगतात. या काळात लोकांना अनवाणी राहावे लागते. हे रात्रभर सुरू असते. ज्यांना या विधीमध्ये भाग घ्यायचा आहे ते मंदिरांभोवती धावतात आणि मैदानात जमण्यापूर्वी सकाळी शेणाची पोळी जाळतात. यावेळी ते स्वतःवर अंगारही फेकतात आणि होळीचा आनंद लुटतात. असे मानले जाते की या अग्नीवर धावल्यास मागील वर्षातील पाप मिटले जातात आणि आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे, विशेष म्हणजे, असे करताना आजवर यात कोणीही जखमी झाल्याची घटना घडलेली नाही.