Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शापित गाव! एका रात्रीत निर्मनुष्य झालं राजस्थानचे ‘हे’ गाव; आजही या ठिकाणी जायला घाबरतात लोक

राजस्थानला भारतातील सांस्कृतिक वारसा आणि ऐकिहासिक वारसा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक दूरवरून भेट देण्यासाठी येतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 02, 2024 | 05:56 PM
शापित गाव! एका रात्रीत निर्मनुष्य झालं राजस्थानचे 'हे' गाव; आजही या ठिकाणी जायला घाबरतात लोक

शापित गाव! एका रात्रीत निर्मनुष्य झालं राजस्थानचे 'हे' गाव; आजही या ठिकाणी जायला घाबरतात लोक

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानला भारतातील सांस्कृतिक वारसा आणि ऐकिहासिक वारसा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक दूरवरून भेट देण्यासाठी येतात. येथील सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणे लोकांना भुरळ घालतात. ही ठिकाणे जगभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या ठिकाणी एक असे रहस्यमयी गाव आहे जिथे एका रात्रीत सगळे लोक गायब झाले. ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.

एका रात्रीत गायब झाले लोक कारण

तर राजस्थानच्या जैलसमेर जिल्ह्यातील कुलधारा गावची एक अनोखी आणि रहस्यमयी कथा आहे. एक असे गाव आहे जे रात्रीत एका रात्रीत गायब झाले होते. एका कथेनुसार, एकेकाळी पालीवाल ब्राह्मणांनी वसलेल्या या गावामध्ये पाच हजारांहून अधिक लोक राहत होते. मात्र आज या गावातील घरे उजाड आणि पडझड झाली आहेत. या गावात एकही मनुष्य तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या गावात अनेक वर्षांपासून भुताटकीचा वास असल्याचे येथील आसपासचे लोक सांगतात. यामुळे आजही लोक या ठिकाणी जाण्यास घाबरतात.

हे देखील वाचा- जोडप्यांसाठी खास IRCTC टूर पॅकेज; हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन, लगेच तिकीट बुक करा

निर्दयी दिवाण

असे मानले जाते की, राजस्थानमधील कुलधारा गावात सलीम सिंग नावाचा एक अत्यंत निर्दयी दिवाण होता. त्याच्या क्रूर कृत्यांनी गावकऱ्यांचे जीवन त्रासदायक बनले होते. एकदा या सलीम सिंगने प्रधानाच्या मुलीला त्रास दिला होता. तसेच त्याने तिच्याशी लग्न करायचे ठरवले होते. मात्र, प्रधानाने त्याला नकार दिला. परंतु सलीमने तिचे उपहरण केले. या घटनांमुळे गावातील लोकांना राग आला आणि त्यांनी प्रधानासोबत बैठक घेऊन सर्वांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

शाप

त्याच वेळी गाव सोडताना, त्या गावातील एका ब्राह्मणांच्या एका प्रमुखाने सलीम सिगंला शाप दिला. याशापानुसार, सलीम कधीही गावामध्ये राहू शकणार नाही. त्यानंतर गावातील सर्व लोक तिथून निघून गेले. त्यानंतर कधीच परत आले नाहीत. या घटनेमुळे कुलधारा गाव शापित ठिकाण बनले. या ठिकाणी आजही राजस्थानमधील लोक जाण्याचे, राहण्याचे धाडस करत नाहीत. गाव सोडताना, ब्राह्मणांच्या एका प्रमुखाने सलीम सिंगला शाप दिला. शापानुसार, सलीम कधीही या गावात स्थायिक होऊ शकणार नाही. गावातील लोक एकाच रात्री भूतकाळाकडे निघून गेले आणि त्यानंतर कधीच परत आले नाहीत. या घटनेमुळे कुलधारा गाव शापित ठिकाण बनले, जिथे आजही कोणतीही व्यक्ती राहण्यासाठी धाडस करत नाही.

कुलधारा भारतीय संस्कृतीत एक अनोखी ओळख

राजस्थानचे कुलधारा हे गाव आज केवळ खंडित घरे आणि अवशेषांचे गूढ शिल्प बनलेले आहे. गावाची शांतता आणि अंधाराची छाया लोकांना भयभीत करून सोडते. अनेक पर्यटक या गावाला भेट देतात. मात्र या गावात नंतर कोणाही थांबत नाही. आसपासच्या गावातील लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, येथे काहीतरी अदृश्य आणि भयावह आहे असे त्यांना वाटते. कुलधारा गावाच्या या कथेमुळे, ही जागा एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक धरोहर बनली आहे. आजही या गावाच्या कथा आणि शाप यामुळे लोकांच्या मनात एक गूढता आहे. यामुळे कुलधारा भारतीय संस्कृतीत एक अनोखी ओळख बनले आहे.

हे देखील वाचा- विकेंड ट्रीप प्लॅन करताय? मग उज्जैनच्या या आसपासाच्या अद्भुत ठिकाणांना नक्की भेट द्या

Web Title: Rajsthan mystrious village which disappeared overnight nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 05:56 PM

Topics:  

  • rajasthan

संबंधित बातम्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
1

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन
2

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला
3

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

पृथ्वीवरील स्वर्गच जणू…! लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही… राजस्थानचे हे ‘डम्पिंग यार्ड’ पाहाल तर मालदीव पण विसराल
4

पृथ्वीवरील स्वर्गच जणू…! लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही… राजस्थानचे हे ‘डम्पिंग यार्ड’ पाहाल तर मालदीव पण विसराल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.