दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेवरून ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलन चिरडण्यासाठी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेणारे मोदी सरकार डरपोक आहे. दडपशाहीने विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. हीच भूमिका कायम राहिली तर नजीकच्या काळात भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा काळे यांनी दिला. नीट परीक्षा प्रकरण, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. आंदोलनाच्या वीस दिवसांत सरकारचा एकही प्रतिनिधी आंदोलकांशी बोलण्यासाठी पुढे आला नाही. उलट आंदोलन मोडून काढण्यासाठी दडपशाही केली जात आहे. अभिजीत दिपके यांच्यावर झालेली मारहाण, महिला आंदोलकांशी झालेल्या गैरवर्तनाच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमार या घटना सरकारचा खरा चेहरा दाखवणाऱ्या आहेत.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेवरून ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलन चिरडण्यासाठी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेणारे मोदी सरकार डरपोक आहे. दडपशाहीने विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. हीच भूमिका कायम राहिली तर नजीकच्या काळात भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा काळे यांनी दिला. नीट परीक्षा प्रकरण, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. आंदोलनाच्या वीस दिवसांत सरकारचा एकही प्रतिनिधी आंदोलकांशी बोलण्यासाठी पुढे आला नाही. उलट आंदोलन मोडून काढण्यासाठी दडपशाही केली जात आहे. अभिजीत दिपके यांच्यावर झालेली मारहाण, महिला आंदोलकांशी झालेल्या गैरवर्तनाच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमार या घटना सरकारचा खरा चेहरा दाखवणाऱ्या आहेत.