प्रशासकीय अनास्था आणि पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. एकरी केवळ ३०० ते १००० रुपये असा थट्टेखोर पीक विमा मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रगती शेतकरी मंडळ व इतर विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर भव्य ‘ट्रॅक्टर महामोर्चा’ काढला. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले होते. मूर्तिजापूर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांना एकरी फक्त ३०० ते १,००० रुपये एवढीच नाममात्र नुकसानभरपाई मिळाली आहे. अनेक गरजू शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे पुढे करून विमा नाकारण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर प्रहार करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तापमानाचा पारा वाढलेला असतानाही मूर्तिजापूर परिसरातील शेकडो शेतकरी सकाळीच ट्रॅक्टरसह एकत्र आले होते. प्रगती शेतकरी मंडळाचे पदाधिकारी आणि विविध शेतकरी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला. शेतकऱ्यांची थट्टा थांबवा, हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेल होत.
प्रशासकीय अनास्था आणि पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. एकरी केवळ ३०० ते १००० रुपये असा थट्टेखोर पीक विमा मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रगती शेतकरी मंडळ व इतर विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर भव्य ‘ट्रॅक्टर महामोर्चा’ काढला. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले होते. मूर्तिजापूर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांना एकरी फक्त ३०० ते १,००० रुपये एवढीच नाममात्र नुकसानभरपाई मिळाली आहे. अनेक गरजू शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे पुढे करून विमा नाकारण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर प्रहार करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तापमानाचा पारा वाढलेला असतानाही मूर्तिजापूर परिसरातील शेकडो शेतकरी सकाळीच ट्रॅक्टरसह एकत्र आले होते. प्रगती शेतकरी मंडळाचे पदाधिकारी आणि विविध शेतकरी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला. शेतकऱ्यांची थट्टा थांबवा, हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेल होत.