
amravati
पश्चिम बंगालमधील सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका आवाहनाची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इंधनाचा वापर कमी करा, परदेश दौरे टाळा आणि एक वर्ष सोने खरेदी करू नका, असे आवाहन मोदींनी नागरिकांना केले. मात्र या विधानानंतर नागरिकांन मधे तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. हैदराबादमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आर्थिक संकट, पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या इंधन आयातीचा उल्लेख करत नागरिकांना काटकसरीचा संदेश दिला.