राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावत चालली असून, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलींवर,बालकांवर अत्याचार वाढले आहेत. विधानसभेमध्ये देखील अनेक वेळा हे मुद्दे मांडून याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारकडून यावर प्रतिसाद मिळत नाही. असा आरोप माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केलाय. दरम्यान आपल्यावर अंकुश ठेवणारे कोणी नाही हा आत्मविश्वास गुन्हेगारांमध्ये बळावला आहे. समृद्धी महामार्गावरील वाहनांचे नंबर प्लेट काढून वाहने अडवून लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. गुन्हा घडल्यानंतर पोलीस पोहचतात, परंतु गुन्हा होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. अशी मागणीही आमदार जयंत पाटील यांनी केलीय. सांगलीच्या आष्टामध्ये गुन्हेगारी आणि अवैधधंदे वाढल्याने या अवैधधंद्यावर कारवाई करावी. अशी मागणीही त्यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे. .
राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावत चालली असून, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलींवर,बालकांवर अत्याचार वाढले आहेत. विधानसभेमध्ये देखील अनेक वेळा हे मुद्दे मांडून याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारकडून यावर प्रतिसाद मिळत नाही. असा आरोप माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केलाय. दरम्यान आपल्यावर अंकुश ठेवणारे कोणी नाही हा आत्मविश्वास गुन्हेगारांमध्ये बळावला आहे. समृद्धी महामार्गावरील वाहनांचे नंबर प्लेट काढून वाहने अडवून लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. गुन्हा घडल्यानंतर पोलीस पोहचतात, परंतु गुन्हा होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. अशी मागणीही आमदार जयंत पाटील यांनी केलीय. सांगलीच्या आष्टामध्ये गुन्हेगारी आणि अवैधधंदे वाढल्याने या अवैधधंद्यावर कारवाई करावी. अशी मागणीही त्यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे. .