मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी परिसरात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. नवलाख उंब्रे येथील बदलवाडी आणि मिंडवडी ग्रामपंचायतीची वैकुंठ स्मशानभूमी एमआयडीसीने पोलिस बंदोबस्तात पाडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अलीकडेच ठाकर समाजातील एका महिलेचे अंत्यसंस्कार स्मशानभूमी नसल्याने घराशेजारीच दफन करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली.उद्योग विकासासाठी हजारो एकर जमीन दिल्यानंतरही मूलभूत सुविधा हिरावल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याची मागणी करत उद्यापासून बदलवाडी आणि मिंडवडी ग्रामस्थ मावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसी परिसरात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. नवलाख उंब्रे येथील बदलवाडी आणि मिंडवडी ग्रामपंचायतीची वैकुंठ स्मशानभूमी एमआयडीसीने पोलिस बंदोबस्तात पाडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अलीकडेच ठाकर समाजातील एका महिलेचे अंत्यसंस्कार स्मशानभूमी नसल्याने घराशेजारीच दफन करावे लागल्याची धक्कादायक घटना घडली.उद्योग विकासासाठी हजारो एकर जमीन दिल्यानंतरही मूलभूत सुविधा हिरावल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याची मागणी करत उद्यापासून बदलवाडी आणि मिंडवडी ग्रामस्थ मावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.