पुणे शहरातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. वॉटर फिल्टरचा जोरदार शॉक लागून आष्टीच्या चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याचा मृत्य झाला. चैतन्य कुंडलिक चव्हाण असे मृत विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असून तो बीडच्या आष्टी तालुक्यातील रहिवासी होता. चैतन्य हा पुणे कृषी महाविद्यालयाचा MBA शाखेचा विद्यार्थी आहे. तो प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. १४ मार्चला रात्री ८ ते ९ च्या दरम्यान तो जेवणासाठी मेसमध्ये गेला. जेवणापूर्वी पाणी पिण्यासाठी तो मेसमधील फिल्टरजवळ गेला असता, अचानक विजेचा मोठा धक्का लागून तो जमिनीवर कोसळला. जवळपासच्या विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मंगळवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चैतन्य गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता, मात्र अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली.
पुणे शहरातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. वॉटर फिल्टरचा जोरदार शॉक लागून आष्टीच्या चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याचा मृत्य झाला. चैतन्य कुंडलिक चव्हाण असे मृत विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असून तो बीडच्या आष्टी तालुक्यातील रहिवासी होता. चैतन्य हा पुणे कृषी महाविद्यालयाचा MBA शाखेचा विद्यार्थी आहे. तो प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. १४ मार्चला रात्री ८ ते ९ च्या दरम्यान तो जेवणासाठी मेसमध्ये गेला. जेवणापूर्वी पाणी पिण्यासाठी तो मेसमधील फिल्टरजवळ गेला असता, अचानक विजेचा मोठा धक्का लागून तो जमिनीवर कोसळला. जवळपासच्या विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मंगळवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चैतन्य गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता, मात्र अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली.