वसई-विरार शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत आणि कार्यालयीन गर्दीत परिस्थिती अधिकच बिकट बनते. पोलीस प्रशासनाकडून दुचाकी वाहनांवर नियमित कारवाई केली जाते. अनधिकृतपणे उभ्या असलेल्या बाईक टोईंग करून उचलल्या जातात आणि दंडही आकारला जातो. मात्र चारचाकी वाहनांबाबत तितकीशी ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे “नियम व कारवाई फक्त बाईकस्वारांसाठीच आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वसई-विरार शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत आणि कार्यालयीन गर्दीत परिस्थिती अधिकच बिकट बनते. पोलीस प्रशासनाकडून दुचाकी वाहनांवर नियमित कारवाई केली जाते. अनधिकृतपणे उभ्या असलेल्या बाईक टोईंग करून उचलल्या जातात आणि दंडही आकारला जातो. मात्र चारचाकी वाहनांबाबत तितकीशी ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे “नियम व कारवाई फक्त बाईकस्वारांसाठीच आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.