
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वसई, नालासोपारा, नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू विरार परिसरात रात्रीच्यावेळी अनेक खाऊ गल्ल्या सुरु होतात. त्याठिकाणी गोरगरीब आणि चाकरमानी मोठ्या प्रमाणावर येत असतात. अशाच एका विरार पश्चिमेकडील जकात नाका खाऊ गल्लीत केलेल्या पाहणीत मोठ्या संख्येने खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असल्याचे दिसून आले. या गाड्यांवर नूडल्स, फ्राइड राईस, मंच्युरियन यांसह विविध चायनीज पदार्थ तयार करून ग्राहकांना विकले जातात.
वसई-विरार शहरातील सर्व रस्त्यावरील खाद्यविक्रेते आणि खाऊ गल्ल्यांची विशेष तातडीची गरज असताना हॉटेल आणि मोहीम राबवून तपासणी करण्याची डेअरींवर कारवाई होत असेल तर उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांसाठी वेगळे नियम का? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने केवळ कारवाईपुरते न राहता नियमित तपासणी आणि स्वच्छतेबाबत कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी धूळ, माती आणि वाहनांची वर्दळ असते. अनेकदा तयार पदार्थ उघडे ठेवले जात असल्याने त्यावर धूळ किंवा अन्य दूषित घटक बसण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. रस्त्यावरील साचलेले दूषित पाणी, चिखल आणि अस्वच्छ वातावरणाचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून शहरातील हॉटेल, डेअरी आणि पानटपऱ्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, त्याच धर्तीवर रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांचीही नियमित तपासणी होते का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे. खाद्यपदार्थांसाठी वापरले जाणारे पाणी, खाद्यतेल, कच्चा माल, साठवणूक व्यवस्था, गॅसजवळील स्वच्छता तसेच विक्रेत्यांची वैयक्तिक स्वच्छता यांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव