
Jodhpur Accident: राजस्थानातील जोधपुर जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कॉर्पिओची समोरुन येणाऱ्या डंपरला जोरदार टक्कर झाली. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की स्कॉर्पिओचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या दुर्घटनेत पाच जणांना जीव गमवाव लागला, तर तीनजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ही घटना बारमेर- जोधपूर राष्ट्रीय महामार्गवरील भाडियावास गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी ह्रदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. वाहनात अडकलेले प्रवासी मदतीसाठी ओरडत होते. त्यांच्या आवाजाने परिसरातील नागरिक तातडीने धावून आले. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले आणि जखमींना त्वर्रित दवाखान्यात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने बालोत्रा येथील सरकारी नाहटा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. उर्वरित गंभीर जखमींना अधिक उपचारांसाठी जोधपूरमधील रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आणखी दोघांचा मृत्यू झाला.
Mumbai AC Local : एसी बंद, प्रवाशांची घुसमट; मुलुंड रेल्वे स्थानकात एसी …
अपघातात मृत झालेल्या नागरिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. मृतांमध्ये रेवंत राम, स्वरूपराम, भरत, किशन आणि भावेश असे आहे. दरम्यान सर्व भाविक बालोत्रा जिल्ह्यातील कानोडा गावाचे होते.धार्मिक दर्शन करून ते आपल्या गावाकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
बालोतरा में भीषण सड़क हादसा, स्कॉर्पियो के उड़े परखच्चे राजस्थान के बालोतरा जिले में भाडिंयावास गांव के पास देर रात जोधपुर नेशनल हाईवे पर एक दर्दनाक सड़क हादसा हो गया। तेज रफ्तार स्कॉर्पियो किसी अज्ञात वाहन से टकरा गई। टक्कर इतनी भीषण थी कि स्कॉर्पियो पूरी तरह क्षतिग्रस्त हो गई… pic.twitter.com/ULI3sSgcp2 — Ashok Shera (@ashokshera94) July 13, 2026
प्राथमिक माहितीनुसार, स्कॉर्पिओ आणि डंपर यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग, रस्त्यावरील परिस्थिती आणि इतर तांत्रिक बाबींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं
या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि रात्रीच्या प्रवासात अधिक काळजी घेणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या घटनेतून होते. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
https://twitter.com/i/status/2076551803936882807
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. जखमींवर सर्वोत्तम उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे.