
लाकडं रचली, आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं शरीर अन् पुढे जे घडलं... Video Viral
काय आहे प्रकरण?
शिवपुरीच्या मुक्तिधाममध्ये एका अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक वन विभागाचे पथक आले आणि त्यांनी चितेवरील मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत नेण्याची घाई केली. खरंतर घडलं असं की, मृत झालेला तो व्यक्ती वन विभागाचा कर्मचारी होता ज्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सरकारी प्रक्रिया आणि फायदे सुनिश्चित करण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे विभागाने म्हटले आहे आणि म्हणूनच मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चितेवरुन उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बनवारीलाल रजक नावाचा एक माणूस वन विभागात तैनात होता. सोमवारी दुपारी तो एका सहकारी वन कर्मचाऱ्यासोबत दुचाकी चालवत होता . मायापूर पोलिस स्टेशन परिसरातील रनौद रोडवरील राजापूर गावाजवळ, दुचाकी अनियंत्रित झाली आणि दोघेही पडले. बनवारीलाल गंभीर जखमी झाले आणि त्यांना ताबडतोब शिवपुरी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले . त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाला घरी पोहचवल्यानंतर कुटुंबियांनी प्रशासनाला न कळवताच अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. जेव्हा वनविभागाला याविषयी समजले तेव्हा कर्माचारी ताबडतोब स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी मृतदेह चितेवर रोखला आणि शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात नेला.
वन विभागाचे अधिकाऱ्यांनी म्हटले की, मृत व्यक्ती हा बनवारीलाल एक सरकारी कर्मचारी होता. त्यामुळे विभागीय लाभ, विमा, आर्थिक मदत आणि इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी शवविच्छेदन अनिवार्य आहे. जर शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार केले गेले असते तर कुटुंब अनेक सरकारी लाभांपासून वंचित राहू शकले असते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्मशानभूमीत गोंधळ माजला परंतु अधिकाऱ्यांनी लेगचच कुटुंबियांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. नंतर कुटुंबाने विभागाची कारवाई योग्य असल्याचे मान्य करत सहकार्य केले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.