
India China Relations
शांघायमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रिमलाइनरने रविवारी (०१ फेब्रुवारी) दिल्ली ते शांघाय दरम्याने थेट आणि पहिले उड्डाण सुरु केले आहे. या विमानात एकूण २३० प्रवासी होते. नवी दिल्लीहून शांघायच्या पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे लँडिंग झाले. यावेळी शांघाय विमानतळाने विमानाचे स्वागत केले. तसेच भारताच्या या निर्णयाचे देखील स्वागत करण्यात आले आहे. भारताचे कॉन्सुल जनरल प्रतीक माथुर यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले की, यामुळे दोन्ही देशातील संपर्क, व्यापार, आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
भारत आमि चीनमध्ये २०२० चत्या सुरुवातील कोव्हिड-१९ च्या महामारीमुळे विमानसेवा बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे दोन्ही देशांतील संबंधात अधिक तणाव निर्माण झाला होता. शिवाया यापूर्वी दोन्ही देशांमध्ये सीमावाद देखील होता. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांत झालेल्या लष्करी संघर्षामुळे दीर्घकालीन तणावामुळे या सेवा पुन्हा सुरु करण्यास विलंब झाला. परंतु आता दोन्ही देशांतील संबंधात २०२५ पासून सुधारणा होत आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-शांघाय थेट उड्डाण सेवा द्विपक्षीय संबंधासाठी महत्वाची मानली जात आहे.
भारताच्या या निर्णयामुळे भारत ते चीन (China) प्रवास आता सोपा, जलद आणि किफायतशीर झाला आहे. याचा फायदा विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगारांना होणार आहे. तसेच दोन्ही देशांच्या पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. येत्या काळात आणखी उड्डाणे सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत-चीन सहकार्य अधिक वाढेल.
The Consulate General of India in Shanghai, under the leadership of Consul General Pratik Mathur, warmly welcomed the resumption of Air India’s direct flight services between Shanghai and New Delhi, marking a major step forward in restoring people-to-people, business and… pic.twitter.com/xHRffMnTmc — DNA (@dna) February 1, 2026
भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर
Ans: