
bangladesh hindu violence kali temple vandalised after election
बांगलादेशच्या निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडल्या आणि १३ फेब्रुवारी २०२६ ला निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बीएनपीने २१२ जागा जिंकत प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला. तर या निवडणुकीत जमात-ए-इस्लामीला ७६ जागा मिळाल्या. जमात-ए-इस्लामीचा स्थानिक पातळीवर मोठा विजय झाला आहे. निलफामीर जिल्ह्यात जमातने सर्व जागा जिंकल्या आहेत. पण असेही असूनही कट्टरपंथींमध्ये असंतुष्टा पसरली आहे.
निवडणुकीच्या निकालावर कट्टरपंथी संतुष्ट नसून निकाल जाहीर होताच खोकशाबारी येथे काली मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याचे वृत्त मिळाले आहे. मंदिर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंदिरांच्या भिंती फोडण्यात आल्या आहेत. यामुळे हिंदु समुदायामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सीमावर्ती भागात जमात-ए-इस्लामीचा राजकीय प्रभाव वाढला असून हिंदु समुदायात भिती निर्माण केली जात असल्याचे वृत्त आहे.
निवडणुकीनंतरची परिस्थिती
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर बांगलादेशात जातीय तणाव अधिक वाढला आहे. निवडणुकीदरम्यानही हिंदू समुदायावर हल्ले करण्यात आले होते. ही परिस्थिती लक्षात घेताल BNP आणि तारिक रहमान यांच्यासमोर सध्या हिंदु आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. सध्या बांगलादेशातील हिंदू समुदाय रहमान यांच्याकडे आशेने पाहत आहे. प्रचारादरम्यान रहमान यांनी स्वत:ला लोकशाही वादी नेता म्हणून सादर केले होते. आता त्यांच्या या भूमिकेवर ते किती ठाम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवे पंतप्रधान म्हणून घेणार शपथ
तारिक रहमान (Tarique Rahman) यांच्यासाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी अंतरिम सरकारने भव्य शपथविधी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी भारता, पाकिस्तान, चीनसह १३ देशांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे हा सोहळा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जात आहे. भारताकडून ओम बिर्ला सोहळ्याला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
After the election results, the condition of the Kali Temple at the Khokshabari, Sabullipara (Nilphamari-3) is heartbreaking. In Nilphamari, where Bangladesh Jamaat-e-Islami won all seats, minorities are already feeling unsafe.#AllEyesOnBangladeshiHindus… pic.twitter.com/C4w5J4EZ3E — Voice Of BD Hindus 🇧🇩 (@ItzBDHindus) February 15, 2026
Ans: बांगलादेशात निवणुडकीचा निकालानंतर पुन्हा हिंदू समुदायाविरोधात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पातळीवर जमातचा विजय झाला आहे, परंतु कट्टरपंथी जमाव असंतुष्ट असून हिंदू मंदिराची तोडफोड करत असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: बांगलादेश निवडणुकीत जमात-ए-इस्लामीने ७७ जागा मिळवल्या आहेत
Ans: निवडणुकीच्या निकालावर कट्टरपंथी संतुष्ट नसून निकाल जाहीर होताच खोकशाबारी येथे काली मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याचे वृत्त मिळाले आहे.