Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचा ‘डावपेचपूर्ण हस्तक्षेप’; अरुणाचल दाव्यावर भारताचा मात्र थेट नकार

China renames Arunachal Pradesh : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा भारताच्या अरुणाचल प्रदेशवर दावा केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 15, 2025 | 12:16 PM
China renamed 27 places in Arunachal claiming it as its sovereign right

China renamed 27 places in Arunachal claiming it as its sovereign right

Follow Us
Close
Follow Us:

China renames Arunachal Pradesh : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा भारताच्या अरुणाचल प्रदेशवर दावा केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशमधील २७ ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला असून, हा चीनच्या तथाकथित सार्वभौम अधिकाराचा भाग असल्याचा दावा केला आहे. मात्र भारत सरकारने या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहीलच अशी ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे.

चीनची नामांतराची ‘रणनीती’ आणि अरुणाचलवर दावा

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “झांगनान (अरुणाचल प्रदेशचे चीनने दिलेले नाव) हा चीनचा भाग आहे. त्यामुळे या भागातील नावे बदलण्याचा किंवा त्यांचे मानकीकरण करण्याचा अधिकार चीनच्या सार्वभौमत्वाच्या कक्षेत येतो.” हे विधान रॉयटर्सच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिले गेले. चीनने अरुणाचलमधील नावे बदलण्याचा हा पाचवा प्रयत्न आहे. यापूर्वी हे कृत्य २०१७, २०२१, २०२३ आणि २०२४ मध्येही करण्यात आले होते. विशेष म्हणजे, यापैकी प्रत्येक प्रयत्न विशिष्ट काळात – जसे की दलाई लामा यांची भारतभेट (२०१७) किंवा G20 परिषदेचे भारतातील आयोजन (२०२३) – याच वेळी करण्यात आले होते, जे राजकीय संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात.

Just in: China again stakes claim to the Indian State of Arunachal Pradesh. Chinese Foreign ministry statement says changing name of locations in Arunachal Pradesh is ‘within sovereign rights’ Full Statement: https://t.co/Y72nm47bce pic.twitter.com/ZlTvybnHvX — Sidhant Sibal (@sidhant) May 14, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Kirana Hills’ आहे सीझफायर मागील ‘काळं’ सत्य? पाकिस्तानच्या अण्विक धोक्यांचं गूढ आलं जगासमोर

भारताचा ठाम विरोध : “अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग”

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चीनकडून अरुणाचल प्रदेशातील स्थानांची नावे बदलण्याचा जो प्रयत्न सातत्याने केला जात आहे, तो निरर्थक, हास्यास्पद आणि स्वीकारार्ह नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, “अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि कायमस्वरूपी भाग आहे. केवळ नामांतराने ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही.”

भारताने चीनच्या अशा पावलांना ‘राजनैतिक डावपेच’ असे संबोधले असून, चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहण्यासाठी अशा प्रकारे अरुणाचलचा मुद्दा पुढे करत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पाकिस्तानबाबत भारताने अलीकडे घेतलेल्या कडक भूमिकेमुळे चीन अस्वस्थ झाला असून, अशा मार्गाने नवा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्पष्ट दिसते.

चीनचा उद्देश, द्विपक्षीय वादात तृतीय हस्तक्षेप

विश्लेषकांच्या मते, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान चीनकडून अरुणाचलचा मुद्दा उकरून काढणे ही सुनियोजित रणनीती आहे, ज्यामध्ये तो एकाच वेळी दोन उद्देश साध्य करू पाहतो – एकतर पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणे, आणि दुसरे म्हणजे भारतावर दबाव निर्माण करणे. हे करताना चीन स्वतःला या द्विपक्षीय वादात तृतीय पक्ष म्हणून जबरदस्तीने सामील करू पाहत आहे. चीनच्या या हालचालींवर भारत सरकारने वारंवार कडक आणि सुसंगत भूमिका मांडली आहे. चीनने कितीही वेळा नावे बदलली, तरी त्याचा भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा Kirana Hills वरील अणु केंद्रावर हल्ला? अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, तपासणीसाठी पथक रवाना

 चीनची नामांतरणे, एक राजनैतिक नौटंकी

चीनकडून अरुणाचल प्रदेशाच्या गावांची नावे बदलण्याचा प्रयत्न केवळ राजकीय नौटंकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही नावे कितीही वेळा बदलली, तरी अरुणाचल प्रदेश भारताचा एक अभिन्न भाग आहे आणि कायमस्वरूपी राहीलच. भारताच्या ठाम भूमिकेने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या पाठिंब्यामुळे चीनच्या अशा निरर्थक आणि दिशाभूल करणाऱ्या प्रयत्नांना कोणतेही वैध समर्थन मिळण्याची शक्यता नाही. भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, सार्वभौमत्वाच्या बाबतीत कोणत्याही दबावापुढे झुकणे शक्य नाही. मग तो चीनसारखा देश का असेना.

Web Title: China renamed 27 places in arunachal claiming it as its sovereign right

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • China
  • india pakistan war
  • international news

संबंधित बातम्या

World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली
1

World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ
2

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
3

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory
4

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.