Donald Trump says Pakistan and India have agreed full and immediate ceasefire
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. पाकिस्ताने भारतावर सातत्याने हल्ले करत आहे. तथापि भारताने पाकिस्तान हल्ले हाणून पाडले आहेत. दरम्यान याच तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामासाठी सहमती दर्शवली असल्याचे म्हटेल आहे.
शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशात गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरु होते. दरम्यान ट्रम्प यांनी दोन्ही देशांना निष्पक्ष आणि शांततेच्या मार्गाने चर्चा विविध मुद्यांवर चर्चा करावी.
ट्रम्प यांनी म्हटले की, “मला हे सांगताना आनंद होत आहे की अमेरिकेच्या मध्यस्थीने दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे.” ट्रम्प यांनी ही पोस्ट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर केली आहे.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, पाकिस्तान आणि भारत तात्काळ युद्धविरामासाठी सहमती दर्शवत आहे. पाकिस्तान सरकारने नेहमीच शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी कधीही तडजोड केलेली नाही.
Pakistan and India have agreed to a ceasefire with immediate effect. Pakistan has always strived for peace and security in the region, without compromising on its sovereignty and territorial integrity!
— Ishaq Dar (@MIshaqDar50) May 10, 2025
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की, गेल्या 48 तासांमध्ये उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, लष्कर प्रमुख असीम मुनीर, राष्ट्रीय सुरक्षा अजित डोभाल असीम मलीक अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी पूर्ण आणि तातडीच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी विविध मुद्यांवर निष्पक्ष वाटाघाटी सुरु करण्यास दोन्ही देश तयार आहेत.
दरम्यान भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी करारा लागू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान भारत सरकारकडून ही शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे.