
Ebola Outbreak
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, इबोला(Ebola)चा सर्वांधिक प्रादुर्भाव हा काँगोच्या इतुरी प्रांताला बसला आहे. ५० लाख लोकसंख्या असलेल्या या भागात अंतर्गत संघर्ष आणि हिंसाचार सुरु असाताना ही परिस्थिती उद्भवली आहे. दर चार व्यक्तींमध्ये एकाला मानवी मदतीची गरज असून पाचपैकी एका व्यक्तीला घर सोडावे लागत आहे. सततच्या हिंसाचारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा शोध घेणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये अडथळा येत आहे. वेळेत उपचार न झाल्याने आजार जीवघेणा ठरु शकतो असे WHO चे म्हणणे आहे.
WHO ने २२ मे रोजी आजाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय स्तारवर अत्यंत उच्च आणि प्रादेशिक स्चरावर उच्च आणि जागतिक स्तरावर कमी निश्चित असा इशारा दिली आहे. या वाढत्या धोक्यामुळे नागरिक आणि आरोग्य यंत्रणांमधील विश्वासही कमी होत चालला आहे. WHO ने आणि इतर मानतावादी संस्थांनी दुर्गम, संवेदनशील भागात वैद्यकीय मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
इबोलाचा वाढता धोका लक्षात घेता भारतीय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) ने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. भारताने प्रवासाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून यामध्ये नागरिकांना कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत या देशांतील प्रवास पुढे ढकलण्याचा आवाहन करण्यात आले आहे.