• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Greater India Pakistan China Unity Pakistan Peoples View

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

त्यांच्या सरकारच्या अपयश आणि भ्रष्टाचाराबद्दल, पाकिस्तानी जनतेने सांगितले की पूरसारख्या परिस्थितीसाठी येणाऱ्या पैशांपैकी 30% खर्च केला जातो आणि 70% सरकार स्वतःच ठेवते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 12, 2025 | 12:16 PM
greater india pakistan china unity pakistan peoples view

अखंड भारत vs ग्रेटर इस्रायल?' पूरस्थितीत पाकिस्तानच्या जनतेचा संताप ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India Pakistan China geopolitics : पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पंजाब व खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. घरे उद्ध्वस्त झाली, शेकडो कुटुंबं बेघर झाली. मात्र या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या जनतेने आपल्या सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. “पुरनियंत्रणासाठी किंवा आपत्कालीन मदतीसाठी येणाऱ्या पैशांपैकी केवळ ३० टक्के जनता वापरू शकते, तर उर्वरित ७० टक्के भ्रष्टाचाराच्या खाईत जातो,” असा सरळ आरोप लोकांनी केला.

यूट्यूबर सोहेब चौधरी यांनी प्रभावित भागांमध्ये लोकांशी संवाद साधला असता, तेथील नागरिकांनी सरकारसोबतच भारतावरही रोष व्यक्त केला. लोकांचे म्हणणे आहे की, भारत धरणांमधील पाणी साठवून ठेवतो आणि गरजेप्रमाणे सोडतो. यामुळे दरवर्षी पाकिस्तानात पूरस्थिती उद्भवते. काहींनी तर थेट आरोप केला की, भारताने जाणूनबुजून पाकिस्तानकडे पाणी सोडले.

सिंधू पाणी करार आणि वाद

लोकांनी चर्चेत आणलेला मुख्य मुद्दा म्हणजे सिंधू पाणी करार. १९६० मध्ये झालेल्या या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब नद्या पाकिस्तानकडे, तर सतलज, रावी आणि बियास नद्या भारताकडे आहेत. भारताला केवळ २०% पाणी वापरण्याचा अधिकार आहे, तर पाकिस्तान ८०% पाणी वापरतो. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने करार स्थगित केल्याचा दाखला देत लोक म्हणतात की, “भारत आधी पाणी थांबवतो, मग अचानक सोडतो, हे सगळं तो स्वतःच्या फायद्यासाठी करतो.” काही नागरिकांनी असेही सांगितले की, “जर चीनने भारताकडे पाणी सोडले, तर भारत ते आपल्या दिशेने वळवून ठेवेल आणि गरजेप्रमाणे सोडेल. हा सगळा खेळ आमच्या सरकारच्या दुर्लक्षामुळेच आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम

“भारत आमचा शत्रू, पण लोक मात्र मित्र”

पाकिस्तानी नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, सामान्य स्तरावर भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. मात्र सरकारमुळे संबंध सुधारत नाहीत. भारतावर अखंड भारताचा अजेंडा राबवण्याचा आरोप करत लोक म्हणाले की, “जसे इस्रायलला ग्रेटर इस्रायल हवे आहे, तसेच भारत अखंड भारताची स्वप्ने पाहतो. त्यामुळे तो खरा शत्रू आहे.”

शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आक्रोश

पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांमध्ये लोकांचा रोष केवळ भारतावरच नाही तर आपल्या सरकारवरही अधिक आहे. एक नागरिक म्हणाला, “भारतामध्ये ३६ राज्यं आहेत, आमच्याकडे फक्त चार. तरीही आमची सात गावे पाण्यात बुडाली. सरकारकडे ना योजना, ना तयारी. ते फक्त मदतीचे पैसे खाण्यात व्यस्त आहेत. एनजीओच्या नावाखाली भ्रष्टाचार होतो. निधी येतो, पण त्यातील ७०% अधिकारी आणि राजकारणी गिळतात.” काहींनी विकास प्रकल्पांबाबतही नाराजी व्यक्त केली. “आम्हाला वीज, पाणी, शिक्षण यांची गरज होती. पण सरकारने मेट्रो बांधली. तिकीट २० रुपयांचे आणि कर ४० रुपयांचा. लोकांची परिस्थिती बिकट असताना लाखो रुपये प्रकल्पांवर वाया घालवले. कपडे फाटले आहेत, पण लोकांना जबरदस्तीने १० हजारांचे बूट विकले जात आहेत. सरकारला फक्त भ्रष्टाचाराची भूक आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 40 लाख फोनवर पाळत,चिनी तंत्रज्ञान, परदेशी कंपन्यांची मदत; पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारची नागरिकांवर करडी नजर

निधीचा मोठा

पूरासारख्या नैसर्गिक संकटाच्या वेळी सरकारने मदत करायला हवी होती, पण पाकिस्तानातील लोकांच्या आरोपांनुसार निधीचा मोठा भाग भ्रष्टाचाराच्या खाईत जातोय. भारताबाबतही तक्रारी आणि संशय कायम आहेत. मात्र पाकिस्तानच्या जनतेचा खरा आक्रोश आपल्या नेत्यांविरुद्ध आहे. ज्यांनी संकटाला संधी बनवून स्वतःची तिजोरी भरली.

Web Title: Greater india pakistan china unity pakistan peoples view

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • india
  • Israel
  • pakistan
  • Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम
1

India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम

40 लाख फोनवर पाळत,चिनी तंत्रज्ञान, परदेशी कंपन्यांची मदत; पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारची नागरिकांवर करडी नजर
2

40 लाख फोनवर पाळत,चिनी तंत्रज्ञान, परदेशी कंपन्यांची मदत; पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारची नागरिकांवर करडी नजर

इस्रायलचा तब्बल सहा इस्लामिक देशांवर हल्ला; सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी
3

इस्रायलचा तब्बल सहा इस्लामिक देशांवर हल्ला; सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी

India-Nepal FYI: नेपाळमध्ये जाण्यासाठी का लागत नाही पासपोर्ट किंवा व्हिसा? 1950 चा करार काय सांगतो?
4

India-Nepal FYI: नेपाळमध्ये जाण्यासाठी का लागत नाही पासपोर्ट किंवा व्हिसा? 1950 चा करार काय सांगतो?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी…

नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी…

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

Skanda Sashti: स्कंद षष्ठीत शुभ योगात मिळणार वरदान, या पद्धतीने करा कार्तिकेयती पूजा

Skanda Sashti: स्कंद षष्ठीत शुभ योगात मिळणार वरदान, या पद्धतीने करा कार्तिकेयती पूजा

भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर

भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण

Photo : सी पी राधाकृष्णन बनले देशाचे 15 वे उपराष्ट्रपती; पहा शपथविधीचे खास फोटो

Photo : सी पी राधाकृष्णन बनले देशाचे 15 वे उपराष्ट्रपती; पहा शपथविधीचे खास फोटो

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.