Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधू पाणी करारावरून भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; लवाद न्यायालयाच्या निर्णयाने पाकिस्तान आनंदित, भारताचा स्पष्ट नकार

Indus Waters Treaty suspension : सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 28, 2025 | 02:40 PM
India Pakistan clash again over Indus Treaty Pakistan cheers verdict India rejects it

India Pakistan clash again over Indus Treaty Pakistan cheers verdict India rejects it

Follow Us
Close
Follow Us:

Indus Waters Treaty suspension : सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हेग येथील आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांबाबत दिलेल्या निर्णयाचे पाकिस्तानने स्वागत करत, भारताशी चर्चेचे आवाहन केले आहे. मात्र, भारताने या निर्णयाला बेकायदेशीर ठरवत ठाम नकार दिला आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया – संवादाची तयारी

शनिवारी पाकिस्तान सरकारने अधिकृत निवेदन जारी करून लवाद न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यात म्हटले आहे, “सध्याची सर्वोच्च प्राथमिकता म्हणजे भारत आणि पाकिस्तानने अर्थपूर्ण संवादाचा मार्ग शोधणे, ज्यात सिंधू पाणी कराराशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असावा.” पाकिस्तानचा दावा आहे की, हेग लवादाने दिलेला निर्णय सर्व पक्षांसाठी बंधनकारक आहे आणि भारताने त्याचे पालन करावे.

भारताचा जोरदार विरोध – लवादच बेकायदेशीर

पाकिस्तानच्या या विधानानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडक प्रतिक्रिया दिली. भारताने हे स्पष्ट केले की, लवाद न्यायालयाच्या स्थापनेलाच त्यांनी मान्यता दिलेली नाही आणि या प्रकारच्या कुठल्याही प्रक्रियेतील सहभाग बेकायदेशीर मानतो. मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत म्हटले, “१९६० च्या सिंधू पाणी कराराच्या विरोधात जाऊन, बेकायदेशीररित्या स्थापन केलेल्या या लवादाने तथाकथित ‘पूरक निर्णय’ दिला आहे, जो पूर्णपणे अमान्य आहे.” भारताने असेही सांगितले की, हा लवाद पाकिस्तानच्या सांगण्यावरून उभा करण्यात आला असून, हे दहशतवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानकडून आपली जबाबदारी झटकण्याचा हतबल प्रयत्न आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्ध आहे की Meme War! ‘Daddy शिवाय पर्याय नाही…’ इराणने डोनाल्ड ट्रम्पचे नाव घेऊन इस्रायलला डिवचले

कराराच्या स्थगनानंतरचा संघर्ष

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पवित्रा घेत सिंधू पाणी करार स्थगित केला होता. या करारांतर्गत भारताने पाकिस्तानला झेलम, चेनाब आणि सिंधू या नद्यांचे पाणी पुरवले जात होते. मात्र, दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून भारताने करारातील जबाबदाऱ्या न पाळण्याचा निर्णय घेतला. भारताचे म्हणणे आहे की, “जोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित आहे, तोपर्यंत आम्ही करारातील कोणत्याही जबाबदाऱ्यांशी बांधील नाही.”

🇮🇳 India rejects illegal Court of Arbitration on Indus Waters Treaty.
Calls it unauthorized, invalid, and a desperate move by Pakistan to divert attention from terrorism.

🔹 Treaty in abeyance after Pahalgam attack
🔹 India asserts that no illegitimately formed body has the… pic.twitter.com/raH0jsNfLi

— Prashant (@prashant10gaur) June 28, 2025

credit : social media

किशनगंगा आणि रॅटले प्रकल्प वादाचा केंद्रबिंदू

पाकिस्तानने २०१६ पासून किशनगंगा (३३० मेगावॅट) आणि रॅटले (८५० मेगावॅट) जलविद्युत प्रकल्पांवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, हे प्रकल्प सिंधू कराराच्या अटींचा भंग करतात. भारताने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे की, हे प्रकल्प पूर्णतः तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि करारानुसार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada-China Relations : कॅनडाचा चीनवर मोठा घाव! ‘या’ कंपनीला देशातून हाकलले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

 चर्चा होणार की संघर्ष वाढणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत सिंधू पाणी कराराच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद निर्माण झाल्याने राजनैतिक आणि पाणलोट क्षेत्रातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या देशाशी कोणतीही वाटाघाटी शक्य नाही, तर पाकिस्तानने संवादासाठी पुन्हा दार उघडले आहे. येणाऱ्या काळात दोन्ही देशांचा या मुद्द्यावर काय पुढाकार असतो, यावर दक्षिण आशियातील पाण्याचे राजकारण आणि शेजारी संबंधांचा भवितव्य अवलंबून असेल.

Web Title: India pakistan clash again over indus treaty pakistan cheers verdict india rejects it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Indus Water Treaty:
  • pakistan
  • sindhu river

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
3

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
4

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.