Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSF India: घुसखोरांविरोधात परराष्ट्र मंत्रालयाचा बांगलादेशला अल्टीमेटम; अमित शाहांच्या विधानानंतर सीमेवर अभूतपूर्व स्थिती

Illegal Bangladeshi Immigrants Update : सरकारने बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने २,६८० हून अधिक लोकांची यादी ढाक्याला सादर केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 30, 2026 | 11:14 AM
india submits list 2680 illegal immigrants bangladesh detention center west bengal

india submits list 2680 illegal immigrants bangladesh detention center west bengal

Follow Us
Close
Follow Us:
  • २,६८० संशयितांची यादी सुपूर्द
  • पश्चिम बंगालमध्ये सत्तापालटाचा मोठा परिणाम
  • घुसखोरांची स्वतःहून मायदेशी पळता भुई

Illegal Bangladeshi Immigrants List 2026 : भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात केंद्र सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. भारत सरकारने देशातील विविध राज्यांमध्ये छुप्या पद्धतीने राहणाऱ्या २,६८० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांची एक सविस्तर यादी तयार करून ती अधिकृतपणे बांगलादेश ( Bangladesh) सरकारकडे सुपूर्द केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ढाका प्रशासनाला या सर्व व्यक्तींच्या राष्ट्रीयत्वाची आणि नागरिकत्वाची तात्काळ पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. एकदा का बांगलादेशने त्यांच्या नागरिकत्वाची पुष्टी केली, की या सर्व नागरिकांना अधिकृत प्रक्रियेद्वारे थेट सीमेपार म्हणजेच त्यांच्या मायदेशी धाडले जाणार आहे. या मोठ्या घडामोडीमुळे भारत आणि बांगलादेशच्या राजनैतिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाची सडेतोड भूमिका; ५ वर्षांचा प्रलंबित प्रश्न ऐरणीवर

नवी दिल्लीत आयोजित साप्ताहिक पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या संवेदनशील विषयावर भारताची भूमिका स्पष्ट केली. जयस्वाल यांनी सांगितले की, भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर भारतीय कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अनेक प्रकरणांमध्ये बांगलादेशी बाजूकडून ही पडताळणी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. यामुळेच भारताने आता आक्रमक होत ही यादी सुपूर्द केली असून, द्विपक्षीय कराराचा आदर करत बांगलादेशने यावर वेगाने पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vidhi Megha Canada : कॅनडात भारतीय लेकीचा करुण अंत; ड्रग्ज डीलरने घरात घुसून 23 वर्षांच्या विधी मेघाला चाकूने संपवले

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या अ‍ॅक्शनने घुसखोरांचे धाबे दणाणले

या संपूर्ण मोहिमेला खरा वेग मिळाला आहे तो पश्चिम बंगालमधील राजकीय सत्तापालटानंतर. पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आणि सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच अवैध स्थलांतरितांविरोधात युद्धपातळीवर मोहीम उघडली आहे. मुख्यमंत्री अधिकारी यांच्या कडक इशाऱ्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांसाठी तात्पुरती नजरकैद केंद्रे (Detention Centers) उभारण्याचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशानंतर केवळ ४८ तासांच्या आत मुर्शिदाबादमध्ये पहिले हायटेक डिटेंशन सेंटर सुरू करण्यात आले असून इतर जिल्ह्यांमधील केंद्रांचे काम वेगाने सुरू आहे. या अ‍ॅक्शन प्लॅनमुळे अवैध स्थलांतरितांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

Gave money to middlemen networks, used patrolling gap, TMC helped in procuring documents How illegal immigrants from Bangladesh entered India through West Bengalhttps://t.co/YYenL7P2Qc pic.twitter.com/CSUicZeM78 — OpIndia.com (@OpIndia_com) May 29, 2026

credit – social media and Twitter

डिटेंशन सेंटरच्या भीतीने सीमेवर परतण्यासाठी गर्दी

कडक कायदेशीर कारवाई आणि नजरकैद केंद्रात डांबले जाण्याच्या भीतीने, पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातील चित्रात मोठा बदल झाला आहे. मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यांमधील बीएसएफ (सीमा सुरक्षा बल) च्या तपासणी नाक्यांवर शेकडो अवैध बांगलादेशी नागरिक स्वतःहून जमा होत आहेत. ते सुरक्षा दलांकडे आपल्याला पुन्हा बांगलादेशात जाऊ देण्याची विनवणी करत आहेत. सीमा तपासणी नाक्यावरील वरिष्ठ बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे बेकायदेशीर नागरिकांचे स्वतःहून मायदेशी परतण्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांत अचानक प्रचंड वाढले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mount Everest: एव्हरेस्टवर मृत्यू पावलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह परत का आणले जात नाहीत? विज्ञान नाही, पण ‘हेच’ आहे मुख्य कारण

अमित शाह यांची मोठी घोषणा; बीएसएफला मिळाली अतिरिक्त जमीन

याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. शाह यांनी स्पष्ट केले की, जे बेकायदेशीर घुसखोर स्वेच्छेने आणि स्वतःहून भारताची सीमा सोडून आपल्या देशात परत जात आहेत, त्यांच्यावर सरकार कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई करणार नाही किंवा त्यांना अडवणार नाही. याशिवाय, अमित शाह यांनी सीमा सुरक्षा अधिक चोख आणि अभेद्य करण्यासाठी बीएसएफला तात्काळ अतिरिक्त जमीन सुपूर्द केल्याबद्दल बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे जाहीर कौतुक केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या या अभूतपूर्व समन्वयामुळे भारताची पूर्व सीमा आता पूर्णपणे सुरक्षित होत असून, घुसखोरीच्या समस्येवर कायमचा तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत सरकारने बांगलादेशला किती लोकांची यादी दिली आहे?

    Ans: भारत सरकारने २,६८० हून अधिक संशयित बेकायदेशीर घुसखोरांची यादी बांगलादेश सरकारकडे नागरिकत्वाच्या पडताळणीसाठी सुपूर्द केली आहे.

  • Que: पश्चिम बंगालमध्ये पहिले डिटेंशन सेंटर कोठे सुरू झाले आहे?

    Ans: मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या आदेशानंतर अवघ्या ४८ तासांत पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात पहिले नजरकैद केंद्र (Detention Center) उघडण्यात आले आहे.

  • Que: स्वेच्छेने परत जाणाऱ्या घुसखोरांबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी काय सांगितले?

    Ans: जे अवैध स्थलांतरित कोणत्याही त्रासाशिवाय स्वतःहून स्वेच्छेने बांगलादेशात परतत आहेत, त्यांच्यावर भारत सरकार कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही.

Web Title: India submits list 2680 illegal immigrants bangladesh detention center west bengal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Bangladesh
  • India border
  • World news

संबंधित बातम्या

Vidhi Megha Canada : कॅनडात भारतीय लेकीचा करुण अंत; ड्रग्ज डीलरने घरात घुसून 23 वर्षांच्या विधी मेघाला चाकूने संपवले
1

Vidhi Megha Canada : कॅनडात भारतीय लेकीचा करुण अंत; ड्रग्ज डीलरने घरात घुसून 23 वर्षांच्या विधी मेघाला चाकूने संपवले

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार
2

US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक; इराणबाबत अंतिम निर्णय घेणार

SU-57 Deal : आता पाकिस्तानची खैर नाही! भारताला रशियाची ‘सुपरपॉवर’ ऑफर; चीनचीही उडाली झोप
3

SU-57 Deal : आता पाकिस्तानची खैर नाही! भारताला रशियाची ‘सुपरपॉवर’ ऑफर; चीनचीही उडाली झोप

Nepal Ambassador : नेपाळमध्ये थेट अर्जाद्वारे होणार भारतासह 17 देशांतील राजदूतांची भरती; बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय
4

Nepal Ambassador : नेपाळमध्ये थेट अर्जाद्वारे होणार भारतासह 17 देशांतील राजदूतांची भरती; बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.