
india travel advisory iran usa war tension tehran evacuation helpline
India advisory for Iran travel 2026 : पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता लष्करी तणाव पाहता, भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सुरक्षा ‘अॅडव्हायझरी’ (Travel Advisory) जारी केली आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना (PIO) शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही क्षणी संघर्षाचा भडका उडू शकतो, या भीतीने भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधील परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सध्याची सुरक्षा परिस्थिती अस्थिर असून, भारतीय नागरिकांनी स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इराणमधून बाहेर पडावे.” ज्यांना तातडीने निघणे शक्य नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांपासून किंवा गर्दीच्या ठिकाणांपासून लांब राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही असाच इशारा देण्यात आला होता, परंतु आता परिस्थिती अधिक बिघडल्याने ‘तातडीने देश सोडा’ असे शब्द वापरण्यात आले आहेत.
दूतावासाने स्पष्ट केले आहे की, भारतीय नागरिकांनी आपली इमिग्रेशन कागदपत्रे आणि पासपोर्ट नेहमी सोबत ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी दूतावासाने खालील हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afghan War : भारताने पाकिस्तानला सुनावलं अन् तालिबाननेही उपसली हत्यारं; ‘त्या’ एका व्हिडिओने सीमेवर रणकंदन
एकीकडे मुत्सद्दी स्तरावर तणाव वाढत असतानाच, दुसरीकडे इराणने लष्करी हालचाली वेगवान केल्या आहेत. सौदी वृत्तपत्र ‘अल-अरेबिया’च्या वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) लेबनॉनमधील हिजबुल्लाहची प्रत्यक्ष कमान आपल्या हाती घेतली आहे. इराणी अधिकारी आता लेबनॉनमध्ये तळ ठोकून असून ते इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धच्या लष्करी रणनीतीला अंतिम स्वरूप देत आहेत. इस्रायलने बेका व्हॅलीमध्ये केलेल्या ताज्या हल्ल्यात हिजबुल्लाहचे १२ जण ठार झाले असून, त्यावेळी आयआरजीसीचे अधिकारी क्षेपणास्त्र युनिटसोबत महत्त्वाची बैठक घेत असल्याचे समोर आले आहे.
#BREAKING: India issues advisory asking Indian students, pilgrims, business persons and tourists to leave Iran by available means of transport. pic.twitter.com/tMyaUqiC6h — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 23, 2026
credit – social media and Twitter
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) आपल्या प्रगत ‘सय्यद-३जी’ (Sayyad-3G) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. “स्मार्ट कंट्रोल ऑफ द स्ट्रेट” या लष्करी सरावाचा हा भाग होता. शहीद सय्यद शिराझी या युद्धनौकेवरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. इराणने केलेली ही चाचणी म्हणजे अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या नौदलाला दिलेला थेट इशारा असल्याचे मानले जात आहे. या क्षेपणास्त्रामुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारावरही संकट येण्याची चिन्हे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Threat : जगातील सर्वात मोठी ‘रॉकेट तोफ’ सज्ज; किम जोंग-उनची ‘ती’ गर्जना ऐकून दक्षिण कोरियाची झोप उडाली
अमेरिका इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर आणि प्रादेशिक दहशतवादावर प्रहार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर इराणने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायल-हमास युद्धानंतर आता इराण थेट युद्धात उतरल्यास याचे पडसाद संपूर्ण जगावर पडतील. विशेषतः कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक शेअर बाजारावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी परतण्याचे आवाहन केले आहे.
Ans: अमेरिका आणि इराणमधील वाढता लष्करी तणाव आणि युद्धाची शक्यता पाहता, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दूतावासाने देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Ans: भारतीय दूतावासाने विशेष हेल्पलाईन क्रमांक (+989128109115) जारी केले असून नागरिकांनी तात्काळ दूतावासाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.
Ans: हे इराणचे प्रगत क्षेपणास्त्र असून त्याची नुकतीच होर्मुझच्या सामुद्रधुनीत चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र सागरी आणि हवाई लक्ष्यांना अचूक टिपण्यास सक्षम आहे.