
Indian fishermen safely evacuated from Iran
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (११ एप्रिल) भारत सरकारने राबवण्यात आलेल्या रेस्क्यू मोहिमेअंतर्गत ओर्मेनियाच्या मार्गे ३१२ मच्छिमारांना सुखरुप परत आणले आहे. इराणमधील बिघडलेली परिस्थिती आणि इंटरनेंट बंदीमुळे थेट संपर्क साधणे कठीण झाले होते. परंतु परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी केलेल्या राजनैतिक हालचालींमुळे भारतीयांची मायदेशी वापसी झाली आहे. जयशंकर यांनी यासाठी आर्मेनिया सरकार आणि समकक्ष अरारात मिर्झोयान यांचे आभार मानले आहेत.
Another 312 Indian fishermen safely evacuated from Iran to India through Armenia. Thank the Government of Armenia and my friend @AraratMirzoyan for making it possible. @MFAofArmenia — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 11, 2026
याच वेळी दुसरीकडे इस्लामाबादमध्ये पाकिस्तान(Pakistan) च्या मध्यस्थीने अमेरिका इराण शांतता चर्चेला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने इराणच्या शिष्टमंडळाशी संवाद सुरु केला आहे. इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिफब करत आहे. या चर्चेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील महत्त्वाचे नेते अली अकबर अहमदियन यांचा समावेश आहे.
यानंतर पाकिस्तान अमेरिकेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असून याचे नेतृत्त्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस करत आहे. या चर्चेपूर्वी जेडी वेंस यांनी इराणला उघड इशारा दिला होता. इराणने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा अमेरिकेची फसवणूक केली तर त्यांना मदत केली जाणार नाही.
सध्या दोन्ही देशांनी एकमेकांसमोर अत्यंत कडक अटी ठेवल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करण्यास, अण्वस्त्र कार्यक्रम नष्ट करण्यास आणि युरेनियमचे संवर्धन पूर्णपणे थांबवण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे इराने देखील १० अटी ठेवल्या आहेत. तसेच अमेरिकेवर विश्वास नसल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. सध्या या चर्चेचा निकाल संपूर्ण जगासाठी अत्यंत निर्णयाक मानला जात आहे. ही चर्चा यशस्वी व्हावी अशी जगभरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.