Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Politics : बांग्लादेशच्या इतिहासातून भारताचे नाव पुसून टाकायचा मोहम्मद युनूस यांचा डाव, वाचा सविस्तर

बांगलादेशातील राजकीय स्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले असून, त्यामागे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 28, 2025 | 01:30 PM
Mohammad Yunus's alleged plot to erase India's role in Bangladesh's freedom struggle has been criticized

Mohammad Yunus's alleged plot to erase India's role in Bangladesh's freedom struggle has been criticized

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : बांगलादेशातील राजकीय स्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाच्या इतिहासात मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले असून, त्यामागे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेल्या ४० कोटी पुस्तकांमध्ये बांगलादेशच्या निर्मितीतील भारताच्या योगदानाला गौण करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे.

इतिहास बदलण्याचा प्रयत्न?

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बांगलादेशच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कन्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा उल्लेख मोठ्या प्रमाणावर हटवण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताच्या योगदानावरही आघात केला गेला आहे. भारतीय सैन्याच्या मदतीने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले, हे सर्वश्रुत आहे. मात्र, नव्या पुस्तकांमध्ये भारताच्या भूमिकेचा उल्लेख आहे, पण इंदिरा गांधी आणि शेख मुजीब यांचे महत्त्वपूर्ण छायाचित्रे काढून टाकण्यात आली आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Politics: शेख हसीनाचे सरकार नेस्तनाबूत करणाऱ्या विद्यार्थ्याची मोठी घोषणा; बांग्लादेशात पुन्हा येणार राजकीय भूकंप?

पुस्तकांमधील महत्त्वाचे बदल

शेख हसीना आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख गायब – बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना यांची छायाचित्रे तसेच त्यांच्याबद्दल लिहिलेला मजकूर संपूर्णपणे हटवण्यात आला आहे.

शेख मुजीबुर रहमान यांचे योगदान कमी – बांगलादेशच्या निर्मितीमध्ये शेख मुजीब यांचा मोठा वाटा होता, पण नव्या पुस्तकांमध्ये त्यांची भूमिका कमी दाखवण्यात आली आहे.

भारतीय योगदानावर संक्षिप्त उल्लेख – स्वातंत्र्यलढ्यात भारताने दिलेल्या मदतीचा उल्लेख असूनही, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीब यांच्या ऐतिहासिक भेटींची छायाचित्रे व संदर्भ हटवण्यात आले आहेत.

शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये व्यापक फेरफार – बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने नेमलेल्या ५७ हून अधिक तज्ज्ञांच्या टीमने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील ४४१ पुस्तकांमध्ये मोठे बदल केले आहेत.

शेख हसीना यांच्या सत्तापतनानंतर मोठे बदल

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांचे सरकार कोसळले आणि त्या भारतात आश्रयासाठी आल्या. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. नव्या सरकारने सत्तेवर येताच इतिहासाच्या पुनर्लेखनाला प्राधान्य दिल्याचे दिसते.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळाची भूमिका

बांगलादेशाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळाने (NCTB) या बदलांना अधिकृत मान्यता दिली असून, ४० कोटींहून अधिक नव्या पुस्तकांची छपाई झाली आहे. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे, शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेला संदेश पुस्तकांच्या मागील कव्हरवरून काढण्यात आला आहे. त्याऐवजी, जुलै २०२४ मध्ये त्यांच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनांची चित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत.

युनूस यांचा गुप्त हेतू?

तज्ज्ञांच्या मते, मोहम्मद युनूस यांचे सरकार बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात भारतीय नेतृत्वाच्या योगदानाला न्यून करण्याच्या दिशेने काम करत आहे. १९७१ मध्ये भारताच्या सैन्याने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक विजय मिळवून दिला आणि बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळवून दिली. यामुळे भारत आणि बांगलादेश यांचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ झाले. मात्र, नव्या पाठ्यपुस्तकांमधून भारताचे योगदान कमी करणे म्हणजे या ऐतिहासिक सत्याला नाकारण्याचा प्रयत्न आहे.

नव्या पुस्तकांमध्ये काय गहाळ आहे?

सहावीच्या इंग्रजी पुस्तकातून शेख मुजीब आणि इंदिरा गांधी यांची छायाचित्रे हटवण्यात आली आहेत.

मुजीब यांचे भाषण आणि इंदिरा गांधी यांचे स्टेजवरील उपस्थितीचे चित्र गहाळ.

ढाका विमानतळावर मुजीब यांनी इंदिरा गांधी यांचे केलेले स्वागत दर्शवणारे छायाचित्र हटवण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तिसरं महायुद्ध अटळ? उत्तर कोरियाने पुन्हा एकदा जगाला दिला युद्धाचा इशारा

भविष्यातील परिणाम

हा बदल बांगलादेशाच्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर मोठा प्रभाव टाकू शकतो. भारत-बांगलादेश संबंधांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आणि भारत यांचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले होते. मात्र, नव्या सरकारच्या या पावलांमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीती आहे. बांगलादेशाच्या इतिहासाचे जाणीवपूर्वक पुनर्लेखन करून देशाच्या तरुण पिढीसमोर अपूर्ण सत्य मांडण्याचा हा प्रयत्न आहे का, यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Mohammad yunuss alleged plot to erase indias role in bangladeshs freedom struggle has been criticized nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • Mohammad Yunus

संबंधित बातम्या

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन
1

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
2

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा
3

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?
4

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.