Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India-Pakistan tensions : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिला की अफगाण तालिबानशी असलेल्या तणावामुळे इस्लामाबाद दोन आघाड्यांवर युद्धात अडकू शकते. त्यांनी भारताविरुद्ध विष ओकले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 19, 2025 | 10:41 AM
pakistan defense minister khawaja asif two front challenge afghanistan india

pakistan defense minister khawaja asif two front challenge afghanistan india

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानवर हल्ले घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप केला.
  • भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला जोरदार इशारा देत म्हटले “चुकीचं पाऊल टाकलं तर 88 तासांचं ट्रेलर पुरेसं आहे.”
  • अफगाणिस्तान-पाकिस्तान तणाव वाढत असताना, पाकिस्तान दोन आघाड्यांवर संघर्षात अडकण्याची भीती व्यक्त करत आहे.

India-Pakistan tensions : पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध( India) उघडपणे आरोपांची मालिका केली आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान ( Afghanistan-Pakistan) संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेल्या संवेदनशील काळात केलेले त्यांचे हे विधान संपूर्ण दक्षिण आशियात नवी चर्चा निर्माण करत आहे. आसिफ यांनी दावा केला की अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानवर होणाऱ्या हल्ल्यांमागे भारताचा हात आहे. त्यांच्या मते, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष पेटला तर भारतलादेखील त्याचा फायदा होईल.

पाकिस्तानी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिला की इस्लामाबाद दोन आघाड्यांवर युद्धाच्या परिस्थितीत अडकू शकते. भारत आणि अफगाणिस्तान या दोन दिशांनी पाकिस्तानवर दबाव वाढत असून भारताच्या भूमिका व विधानांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

आसिफ यांनी असा दावा केला की पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या सीमापार घुसखोरीवर सौदी अरेबिया, यूएई, इराण आणि चीनसारख्या महत्त्वाच्या देशांनीही चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव मागील काही महिन्यांत वाढत चालला आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांच्या सैन्यात मोठी चकमक झाली होती, ज्यात दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी सहन करावी लागली. परिस्थिती इतकी बिघडली की, तुर्की आणि कतारच्या मध्यस्थीने १९ ऑक्टोबरला युद्धबंदी जाहीर करावी लागली.

तथापि, या वादात भारताला ओढण्याचा प्रयत्न आसिफ यांनी पुन्हा केला, आणि याचा अर्थ पाकिस्तान भारताच्या वाढत्या सामर्थ्याने घाबरलेला आहे, असे स्पष्टपणे दिसून येते. विशेषतः त्यांनी भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानांचा उल्लेख करून भारताची वाढती क्षमता पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकते, असे संकेत दिले.

भारतीय लष्करप्रमुखांचा धारदार इशारा

नवी दिल्लीतील चाणक्य संरक्षण संवाद कार्यक्रमात बोलताना भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. त्यांनी ठामपणे म्हटले की भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला पूर्णपणे तयार आहे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना योग्य उत्तर देण्यात भारत कधीही मागे राहणार नाही. जनरल द्विवेदी यांनी “ऑपरेशन सिंदूर हे फक्त ट्रेलर होते, जे 88 तासांत संपले” असे म्हटल्याने पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ भारत-पाकिस्तान तणावाशी जोडत, पाकिस्तानविरुद्धच्या भावी कारवाईचे संकेत असल्याचे विश्लेषक मानत आहेत. ते पुढे म्हणाले की, “पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही; चर्चा आणि दहशतवाद एकत्र राहू शकत नाही.” हे पाकिस्तानला स्पष्ट संदेश होते की भारत आता निर्णायक पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

तालिबानची भूमिका काय?

अफगाण तालिबानने अद्याप पाकिस्तानच्या दाव्यांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ते नेहमीच सांगतात की अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही. परंतु पाकिस्तानचे दावे, त्यांची भीती आणि वाढते आरोप या सर्वांमधून भारतीय लष्कराची वाढती ताकद पाकिस्तानला खरा धोका वाटत असल्याचे संकेत मिळतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने भारतावर कोणता आरोप केला आहे?

    Ans: पाकिस्तानचा दावा आहे की भारत अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानविरुद्ध हल्ले घडवून आणतो.

  • Que: भारतीय लष्करप्रमुखांचे पाकिस्तानविषयी काय विधान आहे?

    Ans: जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की भारत कोणत्याही युद्धासाठी पूर्ण तयार आहे आणि “ऑपरेशन सिंदूर हे फक्त ट्रेलर होते.

  • Que: अफगाणिस्तान-पाकिस्तान तणाव का वाढला आहे?

    Ans: सीमापार हल्ले, चकमकी, आणि दोन्ही देशांतील वाढते अविश्वास यामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे.

Web Title: Pakistan defense minister khawaja asif two front challenge afghanistan india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • india
  • India pakistan Dispute
  • International Political news
  • Operation Sindoor
  • pakistan

संबंधित बातम्या

500 रुपयांच्या नोटांवर पुन्हा बंदी? खर्च करण्यापूर्वी वाचा या मागाचं सत्य, मार्च 2026 च्या डेडलाईनवर केंद्र सरकारचं वक्तव्य
1

500 रुपयांच्या नोटांवर पुन्हा बंदी? खर्च करण्यापूर्वी वाचा या मागाचं सत्य, मार्च 2026 च्या डेडलाईनवर केंद्र सरकारचं वक्तव्य

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
2

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

Iran Protests : इराणमध्ये क्रांतीची ठिणगी! सर्वोच नेते खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत; मोसादचा धाडसी खुलासा
3

Iran Protests : इराणमध्ये क्रांतीची ठिणगी! सर्वोच नेते खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत; मोसादचा धाडसी खुलासा

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.