Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चर्चा बंद खोलीत व्हावी….’ भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची UNSC मध्ये बैठकीपूर्वी विनंती

Pakistan UN closed-door talks : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 05, 2025 | 09:55 AM
Pakistan is scared of India's actions! Request sent before UN Security Council meeting - Discussions should be held in closed room

Pakistan is scared of India's actions! Request sent before UN Security Council meeting - Discussions should be held in closed room

Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan tensions : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानविरोधात कडवा पवित्रा घेतल्यानंतर आता पाकिस्तानने घाईघाईने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) बैठकीची मागणी केली आहे. भारताच्या निर्णायक प्रतिसादामुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे, त्यामुळे आज (५ मे २०२५) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव चर्चेसाठी मांडण्यात आला.

पाकिस्तानने ही बैठक ‘बंद दरवाजामागे’ (Closed-Door Meeting) घेण्याची विनंती केली असून, ही चर्चा सार्वजनिक केली जाणार नाही. पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पहलगाम हल्ल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती संपूर्ण दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण करू शकते आणि ही बाब आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.”

भारताचे निर्णायक पावले: पाकिस्तान हादरला

२६ पर्यटकांचा बळी गेलेल्या पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानातून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा थेट परिणाम मानले जात आहे. या हल्ल्यानंतर भारताने खालील ठळक निर्णय घेतले:

1. सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला

2. पाकिस्तानसाठी जारी सर्व व्हिसा तातडीने रद्द

3. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील संरक्षण सल्लागारांना परत बोलावले

4. भारत-पाक व्यापार पूर्णतः बंद

या पावलांमुळे पाकिस्तानची आर्थिक आणि राजनैतिक कोंडी झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तान आता UNSC च्या अस्थायी सदस्यपदाचा आधार घेऊन, परिस्थिती आंतरराष्ट्रीय मंचावर उभी करण्याचा प्रयत्न करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात दाखल, एर्दोगान यांचे रणनीतिक पाऊल; काय असेल भारताचा डाव?

पाकिस्तानकडून अण्वस्त्रांची धमकी; भारताने दाखवला संयम

भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, माहिती मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताविरुद्ध अण्वस्त्र युद्धाची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गौरी, गझनवी आणि अब्दाली क्षेपणास्त्रांची आठवण करून देत भारताला डरकाळ्या फोडल्या आहेत.

दुसरीकडे, पंतप्रधान शाहबाज शरीफ आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सतत “दहशतवादाशी आमचा संबंध नाही, चौकशी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी” असा राग आळवत आहेत. तथापि, भारताने त्याच्या भूमिकेत कोणताही बदल केला नाही आणि “दहशतवाद्यांच्या पाठराखणकर्त्यांशी कोणतीही चर्चा शक्य नाही” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

UNSC मध्ये ‘बंद खोलीत’ चर्चा, भारताचा ठाम विरोध

पाकिस्तानच्या मागणीवर आज UNSC मध्ये बंद दरवाजामागे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. भारताने मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त करत “आतंरिक सुरक्षेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची गरज नाही” असे मत मांडले आहे. भारताच्या मते, हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी गटांचा कारनामा असून, जगाने त्यांच्या पाठीशी उभं राहू नये. भारताच्या प्रतिसादामुळे पाकिस्तान एकीकडे UNSC च्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्याचे राजकारण करत आहे, तर दुसरीकडे आपल्यावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दबावापासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ल्यांचे सत्र सुरूच; आत्तापर्यंत देशाचे ‘इतके’ नुकसान

भारत कणखर, पाकिस्तान गोंधळलेला

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केवळ निषेध नव्हे, तर कृतीतून उत्तर दिले आहे. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने UNSC च्या व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला असला तरी, भारताच्या ठाम भूमिकेमुळे आणि जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील सहकार्यामुळे पाकिस्तानला फारसा पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसत नाही.

Web Title: Pakistan scared of india urges closed door un talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली
1

World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ
2

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
3

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory
4

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.