पाकिस्तानची नवी गिधडभभकी! दिल्ली-मुंबईनंतर आता 'या' शहरावर हल्ल्याची धमकी, सर्वत्र खळबळ (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफा ख्वाजा यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला आहे की, भारत त्यांच्याविरोधात फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची योजना आखत आहे. ख्वाजा यांच्या मते, भारत काही मृतदेहांचा वापर करुन दहशतवादी म्हणून जगासमोर सादर करेल आणि या बहाण्याने त्यांच्यावर लष्करी कारवाई करेल असे हायस्पद दावा केला आहे. मात्र यासाठी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तसेच त्यांनी या दाव्यानंतर भारताने कोणत्याही प्रकारे पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली तर पाकिस्तानचे उत्तर केवळ दिल्ली-मुंबईपर्यंत मर्यादित राहणार नाही तर थेट कोलकात्याला लक्ष्य केले जाईल असे खळबळजनक विधान केले आहे. ख्वाजा यांच्या या विधानावरुन पाकिस्तानची लायकी पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.
नुकतेच एका नौदल कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी कठोर शब्दांत पाकिस्तानला सुनावले होते. भारताच्या वाटेला जाण्याचे धाडस केल्यास पाकिस्तानला चोख आणि निर्णायक उत्तर मिळेलं. राजनाथ यांनी ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) चा उल्लेख करत भारतीय सैन्याने अवघ्या २२ मिनिटांत पाकिस्तानला नमतं केलं होते असे म्हटले. या विधानामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला असून बेताल विधाने करत आहे.
शिवाय ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानने यापूर्वी देखील अनेक वेळा भारताच्या शहरांना लक्ष्य करण्याची भाषा केली आहे. दिल्ली-मुंबईवर हल्ल्याची धमकी दिली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना ठार केले होते. मात्र तरीही पाकिस्तानची सुधारलेला नाही.
भारताने पाकिस्तान भारताला केवळ देशांतील समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी डिवचंत असल्याचे म्हटले आहे. भारताची वाढती लष्करी ताकद या धोरणामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे यावरुन स्पष्ट दिसते.
मोठा धोका टळला! डोवाल यांना मारण्याचा रचला कट? पाक दहशतवाद्याकडून ट्रेनिंग घेणाऱ्या ४ जणांना अटक






