Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानने भारताचा इशारा हलक्यात घेऊ नये… पाक तज्ज्ञांनी शाहबाज सरकारला सांगितली तीन महत्त्वाची कारणे

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवून भारताने हे सिद्ध केले आहे की यावेळी ते मोठी पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. दरम्यान, तज्ज्ञही पाकिस्तानला इशारा देत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2025 | 10:22 PM
Pakistani experts warn Shahbaz Take India's warning seriously three key reasons

Pakistani experts warn Shahbaz Take India's warning seriously three key reasons

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack :  काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण गडद झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतला, आणि यामुळे पाकिस्तानसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, पाकिस्तानी तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारताच्या इशाऱ्याला हलक्यात घेणे पाकिस्तानसाठी अतिशय घातक ठरेल, आणि त्यांनी यामागची तीन महत्त्वाची कारणेही मांडली आहेत.

भारताची लष्करी ताकद जबरदस्त वाढली आहे

पाकिस्तानी तज्ज्ञ उमर फारूख यांनी ‘फ्रायडे टाईम्स’ या माध्यमातून स्पष्ट केले की, भारताने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. अमेरिकेकडून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची शस्त्रास्त्रे भारताने मागील पाच वर्षांत खरेदी केली आहेत. याशिवाय फ्रान्स आणि इस्रायल यांच्याकडूनही अत्याधुनिक लष्करी उपकरणांची खरेदी सुरु आहे. यामुळे भारताने आपली लष्करी क्षमता प्रचंड वाढवली असून, पाकिस्तानच्या तुलनेत स्पष्ट लष्करी श्रेष्ठता मिळवली आहे. भारतीय लष्करी रणनीतीकार आता केवळ संरक्षणापुरतेच नव्हे तर आक्रमक धोरणासाठीही सज्ज आहेत. त्यामुळे पाकिस्तानने यावेळी भारताच्या इशाऱ्याला दुर्लक्ष करणे आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते, असे फारूख यांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाण्यानंतर आता पाकिस्तान ‘या’ महत्वाच्या गोष्टीसाठीही तरसणार; भारताचा आणखी एका क्षेत्रावर घाला

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला पाठिंबा मिळणे कठीण

तज्ज्ञांनी दुसरे महत्त्वाचे कारण असे सांगितले की, आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कमकुवत देशांवर बलाढ्य राष्ट्रांचे आक्रमण हे सहजतेने स्वीकारले जाते. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष याचे जिवंत उदाहरण आहे. आज वॉशिंग्टन, तेल अवीव आणि पॅरिस यांच्याशी भारताचे घनिष्ट संबंध आहेत. ही शहरे केवळ भारताला शस्त्रास्त्रे पुरवत नाहीत तर राजकीय पातळीवरही भारताला जोरदार पाठिंबा देतात. त्यामुळे पाकिस्तानने जर भारताचा इशारा दुर्लक्षित केला, तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सहानुभूती मिळण्याची शक्यता अत्यंत क्षीण आहे.

भारताचा आंतरराष्ट्रीय संघ मजबूत आणि सक्रिय झाला आहे

तिसरे आणि सर्वांत गंभीर कारण म्हणजे, पूर्वी जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी तणाव वाढायचा, तेव्हा अमेरिका आणि पश्चिमी देश मध्यस्थी करत युद्ध रोखायचे. १९८७ पासून ते कारगिल युद्धापर्यंत प्रत्येक संघर्षात वॉशिंग्टनने हस्तक्षेप केला होता. मात्र, आजची परिस्थिती बदलली आहे.

वॉशिंग्टनची धोरणात्मक शाखा सध्या भारतासोबत संयुक्त लष्करी नियोजनावर चर्चा करत आहे. एफबीआय आणि राष्ट्रीय गुप्तचर सेवा यांचे वरिष्ठ अधिकारी भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत, जर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली, तर यावेळी पाकिस्तानला कोणतेही आंतरराष्ट्रीय दबाव गट वाचवू शकणार नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपामुळे नाही, तर ‘या’ रहस्यमयी कारणांमुळे थरथरतेय धरती…’ संशोधनातून धक्कादायक गुढ उघड

 पाकिस्तानसमोर गंभीर आव्हान

भारतातील वाढत्या लष्करी सामर्थ्याच्या आणि आंतरराष्ट्रीय राजकीय पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने भारताच्या चेतावणीला गांभीर्याने घेणे अत्यावश्यक आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया केवळ आक्रोशापुरती मर्यादित न राहता व्यवस्थित नियोजनबद्ध प्रतिहल्ला असू शकतो. त्यामुळे पाकिस्तानने भविष्यातील कोणतीही चूक टाळण्यासाठी अतिशय सावधगिरीने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा परिणाम गंभीर असू शकतात.

Web Title: Pakistani experts warn shahbaz take indias warning seriously three key reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • international news
  • Pahalgam Terror Attack
  • sindhu river

संबंधित बातम्या

Iran-Israel War : पश्चिम आशियात युद्धाचं चित्र आणखी बदलतंय; इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, बगदाद विमानतळावर स्फोट
1

Iran-Israel War : पश्चिम आशियात युद्धाचं चित्र आणखी बदलतंय; इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, बगदाद विमानतळावर स्फोट

Foreign Policy: S Jaishankar आणि बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट; Tarique Rahman Govt सोबत भारताची ‘बॅटिंग’ जोरात
2

Foreign Policy: S Jaishankar आणि बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट; Tarique Rahman Govt सोबत भारताची ‘बॅटिंग’ जोरात

Iran-Israel War : इस्त्रायलचा इराणवर पुन्हा मोठा हल्ला; खामेनेई यांच्यानंतर आता सुरक्षाप्रमुखाचा मृत्यू
3

Iran-Israel War : इस्त्रायलचा इराणवर पुन्हा मोठा हल्ला; खामेनेई यांच्यानंतर आता सुरक्षाप्रमुखाचा मृत्यू

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.